दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी अर्चीत चाडंक यांनी महसूल प्रशासनातील खाल पासून वर प्रयत्न च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून माजंरा नदी च्या पात्रातून शासनाने वाळू चा उपसा करताना ठरवुन दिलेल्या सर्व नियमाला तिलांजली देवुन केला जाणाऱ्या उपशाला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या धाडसी कार्यवाही चे जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने कडुन कौतुक होण्या एवजी कार्यकठोर अधिकार्यांना एकटे पाडण्याचा डाव खेळला जात आहे.लहान सहान गोष्टी चे राजकारण आणी एक मेकावर चिखल फेक केल्या प्रमाणे आरोप प्रति आरोप करणारे राजकारणातील सर्व पक्षाचे नेते खासदार, आमदारा सह जिल्हा व तालुका पातळीवरील एकाही नेत्यांनी पोलीस दलातील एका कर्तव्य निष्ठावंत अधिकार्यांच्या कार्यवाही च्या विरोधात वाळू माफीयाला पाठबळ देणाऱ्या महसूल खात्याच्या भ्रष्टाचारी यंत्रनेला जाब विचारला नाही.
या वरून वाळू च्या बेकायदेशीर उपशाच्या मलीदा सर्वापर्यन्त पोहंचतोच पण या धंद्यात आपल्या चेलेचपाट्याच्या माध्यमातून सर्वच पक्षाचे महाभाग सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या मोठ्या कार्यवाही नंतर आजही खुलेआम बेकायदेशीर वाळू चा उपसा, नायगाव, बिलोली, लोहा व जिल्ह्याच्या ठिकाणी आजही वाळू माफीया चा महसूल विभागातील अधिकाऱ्याच्या जिवावर हैदोस चालु आहे.
भ्रष्ट निष्क्रिय शासकीय यंत्रणा ही नांदेड जिल्ह्याची ओळख झाली आहे. या मुळे गुन्हेगाराचे विस्तारीकरण वाढले. त्याला पाठबळ देणारी पॅरलल यंत्रना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उभी राहीली आहे. सर्वसामान्याचे मुडदे लुट-पाट, खंडणी, देवान घेवाणीच्या कारण, , चोऱ्या-माऱ्या, सुपारी च्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात आता नित्याची बाब झाली आहे. प्रख्यात बिल्डर सजंय बियाणी ची हत्या होवून दोन महिन्यांचा कालावधी होत आला. तपासाला कसलीच गती नाही.या हत्या प्रकरणाने जाग आलेली पोलीस यंत्रणा आता कुठे ऍक्टिव मोड वर आल्याने धाडसत्र सुरू झाले देशी कट्टे, तलवारी, बाळगणारे गुन्हेगार पोलीसानां दिसायला आणी सापडायला लागले आहेत. हिच पोलीस यंत्रणा आगोदर जागी झाली असतीतर जिल्ह्यात एवढी गुन्हे गारी वाढली नसती आणी संजय बियाणी सारख्या उमध्या बिल्डर चा बळी गेला नसता. नांदेड जिल्ह्यात जे चालु आहे ते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या साठी नक्कीचं भुषणावह नाही.
या खुनाचा तपास लागावा म्हणुन खा. चिखलीकर यांनी दिल्ली ही गाठली राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना ही साकडे घातले खाल पासून वर प्रयन्त च्या अधिकाऱ्या लनां निवेदन दिली पण तपास लागत नाही गुन्हेगार समोर येत नाहीत पोलीसांचा तपासला गती मिळत नसल्याने या खुना मागचे नेमके गुढ काय हे जनते पुढे पडलेला प्रश्न आहे.
संजय बियाणी यांची हत्या खंडणी, व्यावसायिक स्पर्धा कि अन्य कोणत्या कारणाने झाली हे अद्याप समोर आले नाही का येवू दिले जात नाही या बाबद तर्क वितर्क केले जात आहेत. चर्चेलाही उधाण आले आहे.
नांदेड जिल्हाचे राजकारण आगदी खालच्या पातळीवर गेलेले आहे हे सांगण्यासाठी कोणाचीच गरज नाही. ते जनता रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पहात आहे. पोलीस यंत्रणा सक्षम पणे आपले काम करीत नसल्याने गुन्हेगारी वाढली नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारी चे थैमान चालत असताना नांदेड हैद्राबाद महामार्गावर असलेल्या नरसी फाटा येथे परभणी-हिंगोली जिल्ह्यातील जुगार अड्डा चालकाने क्लब उघडून सर्व सामान्य लोकांची लुट केली.
मुखेड व शंकर नगर येथील मटका चालकाने शेजारच्या तेलंगणा राज्यातून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा छळ केल्याने त्याचा जीव गेला आरोपी सापडत नाहीत आणी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी याचा जाब विचारत नाहीत. चोऱ्याचा तपास लागत नाही गुन्हेगार सापडत नाही हे वास्तव सत्याकडे पोलीस अधिक्षक लक्ष केंद्रित करत नाहीत. रामतिर्थ ठाण्यातील हे ढळक प्रकरण एक उदारण आहे. अशा अनेक घटना घडत असतात त्या समोर येतच नाहीत.
अर्चीत चाडंक या अधिकार्यांनी रात्री अपरात्री भली मोठी कार्यवाही करत माजंरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू चा उपसा करणार्या चार जेसीबी सह ३८ ट्रक घाड मारून जप्त केले. या पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यवाही ने महसूल प्रशासनातील भ्रष्ट चेहरा समोर आला जनमानसात पोलीस अधिकारी सिनेस्टार स्टाईल कार्यवाहीने हिरो ठरले तर महसूल खात्यातील खाल पासून वर प्रयत्न चे अधिकारी भ्रष्ट व व्हिलन ठरले.
जन मानसातुन अर्चीत चाडंक याची वाढती लोक प्रियतेला शह देण्यासाठी महसूल खात्याचे, आरटीओ कार्यालयाचे सर्व नियम कायदे बाजुला सारत पोलीस अधिकार्याची कार्यवाही बेकायदेशीर ठरवत दिवसा ढवळ्या सर्व वहाणे चिखल झाला होता हे कारण पुढे करून सोडून देण्यात आली. हे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला नाअमेद करत भ्रष्टाचारी यंत्रनेचा विजय असल्याचे दाखवत मोठा आनंद काही मंडळींनी शेजारच्या तेलंगणा राज्यात साजरा केला तर सर्व लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प असल्याने पहावयास मिळाले.
अर्चीत चाडंक सारखे चांगले अधिकारी क्वचीत येतात आणि जिल्ह्यातून हताश होवुन जातात. जनता फक्त सोशेल मिडीयावर चर्चाच करत रहाणार आहे काय?