दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कोल्हापूर : राज्यात जेव्हापासून राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून जोरदार पॉलिटिकल गदारोळ झाला.
कारण सहाव्या जागेने या निवडणुकीचा सस्पेन्स वाढवा होता. या जागेवर लढण्यासाठी अपक्ष म्हणून संभाजीराजे पुढे आले. तर दुसरीकडे शिवसेनेने सहावी जागा आम्ही लढवणार असचा पवित्रा घेतला. राजे शिवसेनेकडून लढावे किंवा राजेंना शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी अनेक बैठका पार पडल्या. मात्र त्यातूनही तोडगा निघाला नाही. कारण राजेंटी अट सेनेला मान्य नव्हती. तर सेनेची अट राजेंना मान्य नव्हती. त्यामुळे शेवटी शिवसेनेने या जागेवरून संजय पवार यांना उमेदवारी दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंनी माघार घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला म्हणत हल्लाबोल चढवला. मात्र कालच श्रीमंत शाहू महाराजांनी त्यांचे कान टोचले. त्यानंतर संजय राऊतांनी हा सगळा भाजपचा डाव होता म्हणत भाजपवर हल्लाबोल चढवला . तसेच आज त्यांनी जाऊन श्रीमंत शाहू महाराजांची भेटही घेतली आहे.
या भेटीबाबत संजय राऊतांनी ट्विट करत माहिती दिली आहे. श्रीमंत छत्रपती आदरणीय शाहू महाराज यांची आज कोल्हापूरच्या राजवाड्यात जाऊन भेट घेतली. दिलखुलास चर्चा झाली. शाहू महाराजांचे आशिर्वाद मोलाचे आहेत, असे ट्विट राऊतांनी केले आहे.