दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- नाफेडला राज्यात ६८ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते.हरभरा खरेदीची मुदत २९ मे २०२२ पर्यंत निश्चित केली होती.मात्र,नाफेडला राज्यात देण्यात आलेले ६८ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे २३ मे रोजी हरभरा खरेदी पोर्टल बंद झाले होते.आता ते लवकरच पुन्हा सुरू होईल,असे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले.
राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीशिवाय पडून आहे व खरेदी प्रक्रिया शासनाने पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केली होती.ह्यासबंधी गांभीर्याने शेतकऱ्यांचा विचार लक्षात घेता शासनाकडून सुद्धा हरभरा खरेदीची मुदत १८ जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट तसेच तारखेची मर्यादा वाढविली त्याबद्दल राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शासनाचे आभार मानले.