दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हयात असतांना सांगितलेला शब्द त्यांच्यानंतर मराठा साम्राज्यातील प्रत्येक व्यक्तीने आदेश/प्रमाण म्हणून पाळला मग स्वराज्यासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी राजे असो किंवा त्यानंतर औरंगजेबाला जेरीस आणणारी रणरागिनी शिवरायांची सुनबाई राणी ताराराणी असो किंवा दिल्ली जिंकणारे पेशवे असो किंवा मोघलांच्या घोड्यांनाही जे पाण्यात दिसत असे संताजी-धनाजी असो या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शब्द हा आदेश मानूनच आपले जिवन त्यासाठी समर्पित केले असेच मराठा साम्राज्याचे सरदार आणि नंतर पुढे चालून इंदोरमध्ये स्थायीक झालेले मल्हारराव होळकर यांनी अनेक मंदिरे परकीय आक्रमकांपासून सोडवले त्यानंतर त्यांची सुनबाई अहिल्यादेवी यांनीही हाच वारसा पुढे चालू ठेवत शस्त्र चालवून परकीय सत्तांना धाकात ठेवले त्याबरोबरच शास्त्र जपत हिंदु संस्कृती जपण्यासाठी अनेक मंदिरे, नदीघाट, धर्मशाळा बांधल्या आणि हिंदु संस्कृतीला जिवंत ठेवले व हिंदवी स्वराज्याचा कळस उभा केला.
कर्तुत्ववान, धर्मपारायण, कार्यक्षम,उचित न्याय दान साठी सुप्रसिद्ध असणार्या तसेच अनेक मंदिरे निर्माण करणार्या तसेच अनेक नदीघाट, धर्माशाळा बांधकाम करून एक नव्या युगाची सुरुवात करणार्या परम प्रतापी म्हणून आहिल्यादेवी होळकर यांचा नाव सुवर्णाक्षरांनी लिहिल जात. त्या इंदोर संस्थानाच्या प्रमुख राष्ट्र माता अहिल्यादेवी होळकर या शुर वीर कुशाग्र बुध्दी, महाप्रतापी तसेच न्याय प्रिय, धर्म रक्षक, आणि विशेष म्हणजे महिला असताना सुद्धा आपल्याला मध्ये असणारे नेतृत्व गुण सिद्ध करत देशाभरात आपलं नावलौकिक केले .
अखंड भारत देशातील वेगवेगळ्या प्रांतातील हिंदू धर्माचे दैवत असणारे अनेक मंदिरं अनादी काळापासून अस्तित्वात आहेत.परंतु अनेक परकिय आक्रमण झाले तेव्हा प्रमुख्याने अनेक मंदिरं तोडफोड झाली मंदीराचे रचनेत छेडछाड करून तोडफोड झाली असे प्रकार झाले होते परंतु महाराष्ट्रातील चौंडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर येथे त्यांचा जन्म 31 मे 1975 मध्ये झाला तसेच पुढे चालून त्यांचा इंदोर संस्थानाचे महाप्रतापी मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्हारराव होळकर यांनी आहिल्यादेवी प्रशासन आणि युद्धात निपुण घडवले. तसेच द्वारका, अयोध्या, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर,गया, उज्जैन, परळी वैद्यनाथ तसेच सोमनाथ अशा अनेक मंदिरांच बांधकाम केले व वाराणसी येथील काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ,विष्णुपाद,महाकाळेश्वर अशा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करणार्या राष्ट्र माता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्य काळात अनेक प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या परंतु विविध परकिय आक्रमणापासून नासधुस झालेल्या बहुतांशी मंदीराचे जीर्णोद्धार करण्यात राष्ट्र माता अहिल्यादेवी होळकर यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच भारत देशातील विविध पवित्र नदी तीरावर ज्या ज्या ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहेत त्या ठिकाणी नदी घाट बांधले व देशाच्या वेगवेगळ्या भागात धर्म शाळा सुद्धा बांधल्या तसेच पाणीपुरवठ्यासाठी अनेक चिरंबदी विहीरी, पाणवठे बांधले एक आदर्श शासक कसा असावा याच मुर्तीमंत उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले.
पुढे चालून त्यांच्या अशा अनेक उल्लेखनिय कार्याचा गौरव म्हणून मध्यप्रदेश सरकारने इंदौर विमानतळाला अहिल्यादेवी होळकर विमानतळ असे नाव देवून गौरव केला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व
लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301