दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर मधील चालू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत जिजाऊ ब्रिगेड ने जन आंदोलन उभे केले आहे त्याचाच एक भाग म्हणून जिजाऊ ब्रिगेड लोहारा यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे
त्या निवेदनामध्ये म्हटले आहे की कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये देणगी स्वरूपात जमा झालेला खजिना सरकारी खजिन्यात जमा करण्यात यावा देवीला नेसवण्यात आलेल्या साड्या चा लिलाव करण्यात यावा तसेच गोरगरीब गरजू लोकांना त्या साड्यांचा वाटप करण्यात यावे लोकांनी करोडो रुपये दिलेल्या निधी चा कोल्हापूर तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यासाठी वापर करण्यात यावा मंदिरातील पुजारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून देवीचे दागिनेही लंपास करत आहेत त्यामुळे देवीची पूजा करण्यासाठी खऱ्या हक्कदार असणाऱ्या महिला पुजारी यांची नेमणूक करण्यात यावी भ्रष्टाचारी पुजाऱ्याच्या तावडीतून देवीला मुक्त करावे यासाठी सर्व जाती धर्मातील 50 टक्के महिला पुजारी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी लोहारा जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे यावेळी तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे, उपाध्यक्ष शुभांगीताई चव्हाण, मेघाताई जाधव, गोकर्णाताई कदम आदींनी लोहारा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.