दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नड्डा यांनी पक्ष मुख्यालय वार्तालाप केला. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, धर्मेद्र प्रधान व अनुराग ठाकुर हजर होते. नड्डा म्हणाले की भाजपने कायम सांस्कृतिक विकासावर भर दिला आहे. भारताच्या संस्कृतीला धक्का न लावता विकास करण्याचे पक्षाचे धोरण आहे. सांस्कृतीक मुद्यांवर न्यायालयांच्या व राज्यघटनेच्या माध्यमातूनच निर्णय केले जातात व प्रत्येक भारतीय नागरिकावर ते बंधनकारक असतात. भाजपच्या पालमपूर कार्यकारिणीत रामजन्मभूमीबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता मात्र त्यानंतर काशी-मथुरेबाबत भाजपने असा ठराव मंजूर केलेला नाही. उत्तराखंडमध्ये समान नागरिक संहितेबाबत राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. सर्व नागरिकांना समान न्याय देणे व कोणाचे लांगूलचालन न करणे, भाजपचा हाच त्यामागील सिध्दांत आहे.