दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- अरुण भोई
मंगळवार-रात्री राजेगावात आणि लगतच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मे महिन्यातील या अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला. ऐन वेळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांची व ग्रामस्थांचे तारांबळ उडाली होती. गेल्या अडीच महिन्यांपासून होरपळून काढणाऱ्या उन्हापासून ग्रामस्थांना आज दिलासा मिळाला. रात्री अकरा त्यानंतर वातावरण बदलले. गावागावात सोसाट्याचा वारा सुटला होता. काही ठिकाणी पावसाच्या सरींचा शिडकावा झाला.सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने अंगाची काहीली होत आहे. मात्र, आज रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा आला. त्यामुळे परिसरात तापमानात थोडी घट झाली. परिसरात पावसाच्या सरी कोसळत असताना वाऱ्याचा वेग जास्त होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसला सुरुवात झाल्याने गावात अनेकांची तारांबळ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरामध्ये भयभीत वातावरण तयार झाले होते.