दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
लोणंद. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमिंत्त पालखी मार्गावरील भागांची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी पाहणी केली सोहळ्यांत भाविकांना व वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळविण्यासाठी सर्वच विभागांत समन्वय साधत तयारी करावी असे आवाहन सर्वत्र विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, वाई उपविभागीय राजेंद्रकुमार जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बराडे, बरड पोलीस दूरक्षेत्रांंचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनविणे, खंडाळ्यांचे तहसीलदार दशरथ काळे, लोणंद नगरपंचायतीचे मुख्यकार्याधिकारी संजय गायकवाड, नगराध्यक्षा मधुमती गलिंदे, ओपन नगराध्यक्ष शिवाजी शेळके, पाटील लोणंद पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर नगरसेवक सचिन शेळके, गणीभाई कच्ची, महावितरणचे उपअभियंता सचिन काळे नगरपंचायतीचे बांधकाम विभागाचे अधिकारी सागर मोरे सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी प्रथम दत्त घाट निरा येथील माउलींच्या पादुकांना स्थान घालण्यांच्या ठिकाणी पाहणी केली व त्या भागाची स्वच्छता करण्यांच्या सूचना दिल्या. तसेच दत्त घाट ते लोणंद पालखी तळापर्यंत तसेच चांदोबाचा लिंब पालखी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे काढणे, वारकऱ्यांना स्वच्छ पिण्यांच्या पाण्यांची सोय करणे,फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे ,लोणंद शहरांत चिखल होणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकणे, पालखी काळात अखंड वीज पुरवठा करणे या वर्षी वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षांत घेता वाहतूक कोंडी होऊ नये याबाबत नियोजन करण्यांच्या सूचना यावेळी देण्यांत आल्या. माऊलींचे पहिले उभे रिंगण होणांऱ्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी पाहणी करुन जिल्हाधिकारी यांचा ताफा तरडगांवकडे मार्गस्थ झाला.