दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : कार्यालयीन कामानिमित्त मला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस मुंबईला जावे लागते. पूर्वी अडीच ते तीन तासांत मुंबई गाठत. आता मात्र खंडाळा-लोणावळा गाठण्यासाठीच दोन-अडीच तास लागतात. टोलवरील रांगा, घाटात कारच्या लागणाऱ्या रांगांमुळे द्रुतगतीचा प्रवास आता अधोगतीचा झाला. फार मनस्ताप होतो. संपूर्ण प्रवासात अन्य कोणत्याही कारणाने होणा-या वहातूक कोंडीमुळे दीड दोन वाहने पुढे सरकत नाहीत. मार्गात अपघात झाला तर सांगण्याची सोयच नाही. वहातूक पोलीस नियंत्रक ही अपुरे आहेत. सर्वच सावळा गोंधळ. भरमसाठ टोल देऊनही नशिबी मनस्ताप आणि रेंगाळणारा प्रवास हेच असल्याची भावना व्यक्त करीत होते, या रस्त्यावरील नियमित प्रवासी संकेत जेसूदास. संकेत हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कामानिमित्त पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून नियमित प्रवास करतात. त्यांच्यासारखीच व्यथा या रस्त्याचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांची आहे.