दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
दिनांक 31 मे 2022 रोजी घानवळ ची पेसा ग्रामसभा आयोजित केली असता सदर ग्रामसभेचे अध्यक्ष तथा प्रशासक श्री सुर्यवंशी आणि ग्रामसेवक श्री पाटील यांनी गावातील समस्या ऐकून घेतल्यात, महिलांचे म्हणणे होते की होळी पासून आमच्या गावात पाणी नाही म्हणून श्री सुर्यवंशी यांनी प्रथम प्राधान्य पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दिला व तात्काळ बंद असलेल्या जलसाठ्याच्या ठिकाणी गावातील पुरुष आणि महिला वर्ग यांना घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून येत्या 2-3 दिवसात बंद असलेला पाणीपुरवठा तात्काळ दुरुस्ती करून पूर्ववत सुरू करून देण्याचे आश्वासन दिले, यावेळी गावातील श्री गाडर सर, नामदेव वारघडे, कृष्णा राबडे आणि इतर महिला व पुरुष उपस्थित होते.
तसेच त्यांनी ग्रामसभेत माहिती दिली की आपल्या तालुक्यातील सर्व महसूल गावांना लवकरच वैतरणा धरणातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.