दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी शहरात चोरांचा धुमाकूळ सुरू असून,काही दिवसांपासून शहरात घरफोडी आणि दुकानातून चोरीचे प्रकार वाढलेले आहेत.शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली असून दि.२ जून २०२२ ला शहराच्या सुर्जीतील नेहरू चौक परिसरात दोन ठिकाणी चोरीची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की,रवींद्र बुद्धूलाल कुरील यांचे नेहरु चौक येथील विक्रांती पान सेंटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी परफ्यूम (१८ नग) अंदाजे किंमत १८०० रु.आणि इतर मुद्देमालासह एकूण ४ हजार रुपयांचा माल लंपास केला तर दुसरीकडे नेहरू चौक लगत मोचीपूरा येथील ललिता जवाहरलाल बरडे यांच्या घरी मुलाचे लग्न कार्यप्रसंग असता बाहेर झोपलेल्या पाहुणे सौ.जया कैलास पालकर यांच्या गळ्यातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पंचाली (सेवनपीस किंमत २० हजार) व कविता सुरज बरेलीकर यांच्या गळ्यातील ४ ग्रॅम वजनाचे (किंमत २० हजार) मंगळसूत्र चोरले.
माहितिप्राप्तीनुसार,सौ.जया कै. पालकर व सौ.कविता सुरज बरेलीकर हे ललिता ज.बरडे यांचे नातेवाईक असून बरडे यांच्या मुलाच्या लग्न करिता आले होते.नातेवाईक मुलाचे लग्न कार्य आटोपल्यावर अकोला येथून अंजनगाव सुर्जी येथे परतले.दिवसभर लग्नाच्या दगदगीमुळे मंडपात रात्री गाढ झोपेत असतांना ३ ते ४ वाजताच्या सुमारास चोराने ब्लेडच्या पात्याने महिलांच्या गळ्यातील दागिने काढून घटनास्थळावरून पसार झाला.सदर चोरीच्या घटनेची ठाणेदार अंजनगाव सुर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.