दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची ८ जूनला होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध केले जात असून जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी थेट सिद्धार्थ उद्यानात मॉर्निंग वॉक करायला आलेल्या संभाजीनगरकरांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना सभेचे निमंत्रण दिले. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी, महिला व युवा वर्गाने शिवसेनेच्या वतीने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व सभेला येण्याची हमी दिली.
आज गुरुवारी पहाटे जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख सुगंध कुमार गडवे, राजू दानवे, विश्वनाथ राजपूत, विनायक देशमुख, प्रीतेश जैस्वाल, संदीप सपकाळ, साहेबराव साबळे, बाळू उदागे, सुरेश व्यवहारे, किरण गणोरे, सुधीर घाडगे या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ उद्यानात पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरवासीयांना भेटून जाहीर सभेविषयी माहिती देऊन निमंत्रणही दिले.
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत सभेचे निमंत्रण मिळाल्याने सर्वांचे चेहरे फुलले.
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नागेश्वरवाडी-खडकेश्वर या भागात घरोघरी जाऊन सभेचे निमंत्रण देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरातील सभा ही हिंदुत्वाची हुंकार देणारी ठरणार आहे. या सभेसाठी हजारोच्या संख्येने शिवसैनिक तथा शिवसेनेवर प्रेम करणारे बंधू-भगिनी तसेच युवा उत्सुक असल्याचे पाहावयास मिळाले.
थेट आठवडी बाजारात संवाद
जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्यासह उपशहर प्रमुख किशोर कछवाह, मा.नगरसेवक अनिल जयस्वाल, योगेश शर्मा ,संजय अडणे, नीरज ब्रह्म्भट, राजेश कछवाह, नितीन ढोकरट, हमीद भाई, एजाज चाऊस, विजय डवणे, हिरालाल सागर, पवन पांडे, जोसेफ पाटोळे, प्रवीण अवसरे, पीटर पवार, आशिष लेंगेवार, रोहन राठोड, मनोहर नायडू ,राम गजरा, मदन गव्हाणे या पदाधिकाऱ्यांनी सकाळी छावणीतील आठवडी बाजारात जाऊन जाहीर
सभेसाठीची निमंत्रणे देत नागरिकांशी संवाद साधला. पक्षाची भूमिका आणि सरकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून होत असल्याचे सांगितले. बाजारासाठी आलेल्या नागरिकांनीही शिवसेनेच्या या निमंत्रणाचा स्वीकार करत साद दिली.