दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार
चांडोळ येथे आज महाराणा प्रताप जयंती साजरी केली जात आहे.
महाराणा प्रताप मित्र मंडळा कडून गावात जागो जागी झाडे लावण्यात आले. आणि एक अनोखी जयंती साजरी करण्यात आली.
त्यांच्या या कामा बद्दल गावभर कौतुक होत आहे.
या वेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य पती राजू धनावत, समाजिक नेते नितीन कुटुंबरे,विकास, सचिन, आदी उपस्थित होते.
महाराणा प्रताप बद्दल काही माहिती
आपली वीरता, हुशारी आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे. तर प्रत्येक वर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात असून आज 481वी जयंती आहे. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते.महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या तिथीला साजरी केली जाते. मात्र इंग्रजी कॅलेंडर नुसार त्यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला होता. याच त्यांची जयंती साजरी केली जाते.
तर तिथी नुसार 2जून ला साजरी केली जाते.
महाराणा प्रताप यांच्या विषयी जाणून घ्या ‘या’ विशेष गोष्टी
– महाराणा प्रताप यांचा जन्म महाराजा उदयसिंह आणि माता राणी जिवत कंवर याच्या घरात झाला होता. त्यांना बालपणी आणि तरुणपणात किका नावाने हाक मारली जात होती. हे नाव त्यांना भिल्लांकडून मिळाले होते. सुरुवातीचे काही दिवस महाराणा प्रताप यांनी त्यांच्या सोबत व्यतीत केले होते. भिल्लांच्या बोलीत किकाचा अर्थ ‘मुलगा’ असा होतो.
– महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक नावाचा घोडा होता. हा घोडा त्यांना अत्यंत प्रिय होता. महाराणा प्रताप यांच्या शौर्य कथेत चेतकचे एक वेगळे स्थान आहे. चेतकची स्फूर्ती, गती आणि शौर्य अनेक युद्ध जिंकण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. हल्दीघाटीच्या युद्धात चेतकला गंभीर दुखापत झाली होती, यामुळे चेतकचा मृत्यू झाला होता.
महाराणा प्रताप यांनी मुघलांसोबत अनेक युद्ध लढले. मात्र हल्दीघाटीचे युद्ध ऐतिहासिक मानले गेले आहे. या युद्धात त्यांचे अकबराच्या विशाल सैन्याशी समोर-समोर युद्ध झाले होते. 1576 मध्ये झालेल्या या युद्धात महाराणा प्रताप यांनी 20 हजार सैनिकांनासोबत घेत अकबरच्या 80 हजार मुघल सैनिकांचा सामना केला होता. हे मध्यकालीन भारतातील सर्वात चर्चित युद्ध आहे. या युद्धात महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक जखमी झाला होता. या युद्धानंतर मेवाड, चित्तोड, गोगुंड, कुंभळगड आणि उदयपूरवर मुघलांचे वर्चस्व निर्माण झाले होते. यावेळी बहुतांश राजे मुघलांच्या अधीन झाले होते. मात्र महाराणा प्रताप यांनी कधी स्वाभिमान सोडला नाही. त्यांनी शेवटपर्यंत अकबरसोबत संघर्ष केला.
– 1596 मध्ये शिकार करताना महाराणा प्रताप जखमी झाले. यातून ते कधी बरे झाले नाही. 19 जानेवारी 1597 रोजी वयाच्या 57 व्या वर्षी चावड येथे त्यांचा मृत्यू झाला.