दै चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधि
मोहन आखाडे
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु पेंडेफळ ता वैजापूर येथील शेतकऱ्यांना पिककर्ज पासुन वंचित राहण्याची वेळ आलेली आहे.म्हनुन त्यांनी पीक कर्ज न मिळाल्यास बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा शिऊर येथे प्राणांतीक उपोषणा करनार आहे. सविस्तर प्रकरण असे की, सदरील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जप्रकरणाच्या फाईल शिवुर येथील बँकेत चार ते पाच महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या आहेत आणि महाराष्ट्र बँकेतील मॅनेजर कर्मचारी यांनी त्या जमा करून घेतलेल्या आहे परंतु आजरोजी कर्ज प्रकरण मंजूर केले नाही. शासनाचा नियमा ने ,एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही असेतांनी सुद्धा 30 ते 35 वेळेस हेलपाटे मारून या शेतकऱ्यांना कर्ज मिळेना . यामुळे संतापलेला पेंडेफळ येथील दहा शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
मँनेजर वर्मा साहेब म्हणले कि, आम्ही तुम्हाला पिंककर्ज देतो. अनेक शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप केलेले आहे. असे अस्तांना पेंडेफळ येथील शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही,म्हनुन त्यांनी वैजापूर येथे मागील महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत आमदार प्रा रमेश पाटील बोरनारे सर यांच्यासमोर कैफियत मांडली त्याचा राग मनात धरुन शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत वागनुक देत आहे. पिककर्ज देण्यास जाणीवपुर्वक भेदभाव करीत आहे , म्हनुन संतप्त शेतकऱ्यांनी दि.20/10/2021रोजी पर्यत पिककर्ज न मिळाल्यास दि.21/10/2021 .2;00वाजे पासुन बँके समोर प्राणांतीक उपोषन सुरु करण्यात येईल असं पेंडेफळ येथील दहा शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सरकार चे स्पस्ट आदेश आहे, एक ही शेतकरी पिक कर्जापासून वंचीत रहाता कामा नये.मगअसे असतांनी अनेक शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या फाईली का दाखल करून घेतल्या? व शेतकऱ्यांनी नियमाची साक्षांकित प्रत मागितली असता बँक मॅनेजर यांनी दिली नाहीं. बँक मॅनेजरणी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांना परतून लावतात.एकीकडे शासन म्हणते एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही आणि दुसरीकडे बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीये यावरून असे दिसते की बँक मॅनजर शेतकऱ्यांची फसगत करत आहे, आत्महत्येस प्रवृत्त करत आहे असा सूर शेतकऱ्यांतुन निघत आहे.
या प्रकरणातून असे सिद्ध होते की या बँक कर्मचाऱ्यांवर राजकीय पदाधिकारीर्याचा प्रशासनावर जराही वचक राहिलेला नाहीये व यांच्या बेशिस्त कारभारामुळे शेतकरी भराडला जातोय, यावर प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आम्हांला पीककर्ज द्यावे अन्यथा दि.21रोजी सदरील शेतकरी बँके समोर उपोषन करनार आहे टाळा टाळ केल्यास टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही असे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
शिवाय गावातील प्रमुख पदाधिकारी कारी कार्यकर्ते गोकुळ पाटील आहेर सर चेअरमन पेंडेफळ सोसायटी, मनिषा आहेर सरपंच,मन्सुब आहेर मा सरपंच, एम सी आहेर तंटामुक्त अद्यक्ष, विठ्ठल चव्हाण उपसरपंच पाठिंबा देत उपोषणात सहभागी राहणार आहे.