दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 (Agni-4)ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे देशाच्या लष्करी ताकद वाढली आहे.
संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. अग्नी-४ ची रेंज ४,००० किमी आहे. प्रक्षेपणाने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच संरक्षण प्रणालीची विश्वासार्हता सत्यापित केली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंध क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करते.
काही दिवसापूर्वी भारतीय नौदलाने ‘सीकिंग हेलिकॉप्टर’मधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.
अग्नी 4 भविष्यात भारतीय सैन्याला अधिक ताकद देईल. या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे एकूण वजन १७००० किलोपर्यंत आहे, आणि त्याची एकूण लांबी २० मीटर आहे. अग्नी-4 अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून ते ९०० किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकते.