दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भारतीय स्वातंत्र्य लढयात आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहास ही महत्वाचा आहे.अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी देशांसाठी प्राणाची आहुती दिली.त्यात तंट्या मामा भील,धरतीआबा बिरसा मुंडा,भीमा नायक,क्रांतिवीर खाज्या नाईक,राघोजी भांगरे,राणी दुर्गावती मडावी,झलकारी बाई,हल्दीबाई भील,राणा पूजा भील,वीर बाबू शेडमाके,नारायण सिंह उईके,स्वातंत्र्य सेनानी शामा दादा कोलम अशी अनेक क्रांतिवीर होऊन गेली. मात्र,इतिहासकारांकडून आदिवासी क्रांतिकारक,त्यांच्या इतिहास,उठाव,लढे पाहिजे तेवढे लिहिले नाही हे दुर्दैव आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झंझावात क्रांतिसूर्य,एक सोनेरी पान म्हणजे धरतीआबा बिरसा मुंडा होय.त्याच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहाती गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा व आईचे नाव करमी मुंडा होते.बिरसा मुंडा लहानपणापासून हुशार व बुद्धीमान होते.बासरी वाजविणे,रानात जाऊन धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे.आदिवासीचे प्रस्थापिकांच्या व्यवस्थेविरुद्ध अनेक वेळा विद्रोह केला. इ. स.१७८९ ते १८३२ दरम्यान मुंडा जनजातीने अनेक विद्रोह आंदोलने केली.यातील जास्त प्रभावशाली विद्रोह १८३१- ३२ चा ‘कोल विद्रोह’मुंडा जनजातीच्या वडिलोपार्जित शेतजमीन छोटा नागपूरचे राजा यांचा लहान भाऊ हरनाथ सहाई याने बऱ्याच गावातील शेती जमीनदार,प्रस्थापित सावकार आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिली. साहजिकच,आदिवासीच्या परप्रांतीय व्यापाऱ्यांबद्दल असंतोष वाढला. विद्रोहाची आग गावागावात गेली.सर्व परप्रातीयांना छोटा नागपूर भागातून हुसकावून लावले.यात विद्रोहात मुंडा ४०० मुंडा आदिवासी सहभागी झाले होते.
नंतर,आदिवासीच्या न्याय हक्कांसाठी,अन्याय,अत्याचाराविरुद्ध जल,जंगल,संपत्तीसाठी बिरसा मुंडा यांनी अखंड लढा दिला.इंग्रज, जमीनदार,सावकार गरीब आदिवासींना शोषण,अत्याचार,अन्याय करीत होते. यांच्या परिणाम बिरसा मुंडावर झाला. त्यांनी सरकारी नोकरी करणेही नाकारले.बिरसा मुंडाने गावागावांत जाऊन शोषित,पीडित लोकांना जनजागृती करून ज्योत जागवली. जंगलात जे मिळेल ते खाऊन जनजागृती करीत होते.वैचारिक जागृती केली.बिरसा मुंडाने इंग्रज, जमीनदार यांच्या विरुद्ध’उलगुलान’ सुरू केले.फेब्रुवारी १८९८ मध्ये डोमसारी येथे सभा बोलावली सरदार आंदोलनातील कार्यकर्त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई करण्याचे ठरविले.ऑक्टो,नोव्हें १८९९ मध्ये डोमसारी पुन्हा सभा घेतली बिरसा मुंडाने दोन झेंडे तयार केले.एक पांढरा,दुसरा लाल.पांढरा झेंडा मुंडाच्या प्रतीक होता तर लाल झेंडा आदिवासीच्या शोषण करण्याचे प्रतीक होता.बिरसा मुंडानी ठिकठिकाणी सभा घेऊन लोकांना संघटीत केले.१८९४ मध्ये दुष्काळादरम्यान बिरसा मुंडा यांनी आपला मुंडा समुदायाला आणि अन्य लोकांसाठी कर माफ करण्याचा मागणीसाठी आंदोलन केले.२५ डिसेंबर १८९९ पासून बिरसा मुंडानी ‘मुक्ती’आंदोलनाला सुरवात केली. ‘उलगुलान’ म्हणत ठेकेदार, जमीनदार,इंग्रज यांच्याविरुद्ध ‘उलगुलान’ सुरू केले.डिसेंबर १८९९ च्या रात्री रांचीपासून चाईबासापर्यंतच्या ४०० चौ. मैलाचा विस्तीर्ण भागात ठिकठिकाणी पोलिस चौक्या, इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरांवर अंधारात धनुष्यबाणांचा जोरदार वर्षाव केला.रांची शहरात ४ दिवस अघोषित संचारबंदी होती. सिहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर ठाणे आणि रांची जिल्ह्यातील खुंटी,कर्र।,तोरण, तमाड आणि बसिया ठाण्याचा परिसरात बंडाची ठिणगी पडली.खुंटी ठाण्याचा परिसर या आंदोलनाचा केंद्र होता.
बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसर्गिक न्याय हक्क जल, जंगल,संपत्तीसाठी संघर्ष केला.आदिवासी संस्कृती,आणि अधिकार यांचे संरक्षणासाठी त्यांची आंदोलने होती.त्यांच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपूर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले.आदिवासी जमीन गैर-आदिवासीना विकण्यास बंदी आणली.बिरसा मुंडा यांना झारखंड,ओरिसा, बिहार,पश्चिम बंगालच्या काही भागात देवाप्रमाणे पूजले जाते.बिरसा मुंडाच्या ‘उलगुलान’ विद्रोह इतरांपेक्षा वेगळा होता. त्यांच्या विद्रोहामध्ये विचारधारेचा प्रभाव दिसून येतो.या महान क्रांतिसूर्य योद्धाच्या अंत ९ जून १९०० रोजी झाला.या महान योद्धाला कोटी कोटी विनम्र अभिवादन….
✍️ राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फायटर्स.
मो.९६७३६६१०६०