दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
संस्थानाच्या पूर्वजांच्या छत्र्या झाल्या इतिहास जमा
जव्हार:- जव्हार येथील राजे यशवंतनगर जवळील महालक्ष्मी चे मंदीर हे जागृत देवस्थान असून तिथे दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सव आयोजित केला जातो.१८ व्या शतकात जव्हारच्या राज घराण्याकडून मातेचे मंदिर बांधण्यात आले असून आज ही हे मंदीर जव्हारच्या राज घराण्याच्या मालकीचे आहे.हे जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविक येथे भक्ति भावाने येतात व मातेचे जागृकतेचे अनुभव आज ही येथील नागरीकांन कडून ऐकायला मिळतात.नवसाला पावणारी एक जागृत देवता म्हणून कोकणातील ”जव्हारची महालक्ष्मी” हे स्थान पूर्वी विशाल माळरानावर,निर्जन स्थळी वसले होते.जशी जशी वस्ती वाढू लागली तसे तसे मंदिराचा परिसर वस्तिने वेढला गेला असला तरीही जव्हारच्या राजे यशवंत नगर मधील श्री महालक्ष्मी मंदिराला एक वेगळेच महत्व आहे.१९८८ सालापासून सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.”रौप्य महोत्सव पूर्ति” करणाऱ्या ह्या उत्सवाचे यंदा ३३ वे वर्ष आहे.जव्हार संस्थानचे राजे कै.तिसरे विक्रमशाह यांनी या मंदिराची स्थापना केली होती.मंदिराच्या परिसरात राजघराण्यातील पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या राजे विक्रमशाह यांनी दगडी बांधकामात उभारल्या होत्या मात्र कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने १८ ऑक्टोबरला सोमवारी पहाटे ६ च्या दरम्यान सदर संस्थान कालीन छत्र जमीनदोस्त झाल्या त्यामुळे जव्हारकर नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.देखभाल दुरुस्ती नाही.सदर महालक्ष्मी मंदिर हे जव्हारच्या राजघराण्याच्या मालकीचे आहे.मात्र त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्र जमीनदोस्त झाले आहेत.याबाबत जुन्या पिढीतील नागरीकांनी आठवणींना उजाळा दिला.