दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.१७.मोदी सरकारने संरक्षण व्यवस्थेत पुन्हा एकदा नवा प्रयोग साकारला. देशाच्या लष्करात चार वर्षासाठी सेवा द्यावी व नंतर कायम निवृत्ती घेत पोटापाण्यासाठी वणवण भटकावे. मुळात ही योजना वरवर जरी विशेष वाटत असली तरी बहुजनांच्या मुळावर उठणारी ही योजना ऐन पंचविशीत तरुणांना आयुष्यातुन उठवणारी व आख्खी पिढी संपवणा-या या योजनेचा मुळ उद्देश शिक्षण व रोजगार यापासुन बहुजनांना पध्दतशीरपणे संपवणे हा होय. चार वर्ष लष्करात भाकरी भाजल्यावर ताटात पडण्याऐवजी पाटोवर लाथ बसणार. कायम तैनात लष्कर कमी करुन कामचलावु व्यवस्था निर्माण करुन पुढमागे संरक्षण हा विषयही खाजगी करुन कदाचीत अदानी अंबानीच्या घशात घातला जाईल हे निरर्थक वाटत असले तरी सत्य आहे. मोदी है तो कुछ भी मुनकीन है। लष्करात अनुभवास खुपच महत्व आहे मात्र अनुभव संपवुन तैनाती फौज देशावर लादुन मोदी सरकार काय साधण्याचा प्रयत्न करणार हेच कळत नाही. काश्मीर खोरे अजुनही धुमसत आहे त्यात चार वर्षासाठी आलेले सैनीक प्राणपणाने लढतीलही मात्र हौसला व वर्षाकाढी जमा होणारे अनुभवी कसरती कशा प्राप्त करणार. सैन्यात जाणे हे तरुणास अभिमानास्पद मात्र सरकार ईथे तरुणांची क्रुर थट्टा करत आहे. आज देशात जे काही चालले आहे ते पाहता देशाचे वाटोळे तर होणारच मात्र बहुजनांच्या छाताडावर नवमनुवाद कायम करण्यासाठी संघाचा अजेंडा राबवण्यास मोदी सरकार कटीबध्द दिसत आहे. चार वर्ष सैनिक हा प्रकार हास्यास्पद वाटतो. ईज्रायल सारखा निर्णय असता तर ठिक आहे मात्र बंदुक धरणा-या हातांनाच छाटण्याचा हा भिमपराक्रम करण्यामागे मोदीसरकारची कपटनिती ओळखणे हिच खरी देशभक्ती होईल. अस्थैर्य माजवुन मनुवादाची स्थैर्यता टिकवणे व कायमस्वरुपात राबवणे ह्या अजेंड्याची पुढची पायरी म्हणजे हा निर्णय होय.
असुरक्षीत परीस्थीतीत वादंग निर्माण करुन मनुवादी मनसुबे राबवणे हे आता नविन राहले नाही. विपरीत परीस्थीती तयार करुन देशवासीयांची मनस्थीती बदलणे हे मोदीसरकारच्या हातचा मैल , त्यात कर्तबगारता हरवुन संघाच्या स्वयंसेवकांना प्रशासकीय व्यवस्थेत स्थिर करणे हे पायंडे खुप यशस्वी झाले. संरक्षण हा विषय नव्या पध्दतीने मांडत नवा खेळ करुन भाजपच्या राजकारणी मुलांना मोठ्या हुद्यावर कायम करुन देशात पाकीस्तान सारखे लष्करी हस्तक्षेप कसे करता येतील हे पुढील काही वर्षात यशस्वी होण्यासाठी नवा प्रयोग आहे. लोकशाहीला संपवण्यासाठी प्रशासन , न्यायव्यवस्था व लष्कर ताब्यात आले की लोकशाही संपली. नंतर पोटाच्या प्रश्नाची भ्रांत तयार करुन विवेकबुध्दी हरवलेले तरुण कुणाच्याही जिवावर उठतील. एकदा लोकशाही संपली की तुमचे मुलभुत अधिकार कोण ठरविणार. ज्याप्रमाणे हुकुमशाहा वावरत असतो त्याप्रमाणे देशात नवी हुकुमशाही व्यवस्था अवतरेल. या निर्णयास लोकांना तयार करण्यासाठी तसे बौध्दीक प्रयोग करत लोकांची मानसीकता तयार केल्या जात आहे. कायदा संपला की ठोकशाही सुरु होते. घटनादत्त अधिकार संपले की एकाधिकारशाही राबवीणे सहज होईल. लष्कर हा असा विभाग आहे ज्यात फक्त आणी फक्त देशप्रेम ओतप्रोत भरले आहे. जेव्हा सैन्यात देशप्रेमाऐवजी व्यक्तीप्रेम वाढेल तेव्हा खरी हुकुमशाही सुरु होईल त्यासाठी अशी फौज उद्या सिमेवर व लष्करात दिसली तर नवल नको.
आज देशवासीयांना आपल्या सैन्यावर गर्व आहे अभिमान आहे. तो सदैव कायम रहायला हवा. चार वर्ष नोकरी म्हणजे तरुण बेरोजगारांची क्रुर थट्टा होईल तेव्हा तरुणाईत आगडोंब उसळला तर त्यास मोदीनीती जबाबदार असेल. आणी हीच व्यवस्था बळजबरीने राबवली तर मोदी सरकार ज्यांनी कायम केले त्या जनतेने स्वतचे थडगे सजवुन घेतले असे समजण्यास हरकत नाही…
संतोष गवई
९७३००३५३२२