दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कधीही ध्यानीमनी नसलेलं कोणीही त्याबदल फारस कधीही न ऐकलेलं. असा हा कोविड१९. जंगलातून प्रवास करावा.साथ सोबत नसताना एकट्यानीच जावं व जंगालात अचानक समोरून वाघ येवून डरकाळी फोडावी त्यावेळी जीवाची जी आवस्था होते तशीच अवस्था २०१९ ला कोविड नावाच्या एका दुष्ट राक्षसाने अखील मानव जातीची केली. तोंडाला मुंगसं बांधवा लागला. तोंड लपवत फिरावं लागलं . आईवडील भाऊ बहीन यासर्व नातलगापासून तोंड लपवत जगावं लागलं. कोण वर गेलं , कधी गेलं याचा थांग पत्ता ही नातलगांना वेळेवर लागला नाही. शेवटच्याक्षणी तोंडही पहाता आले नाही. किती मोठं दुर्दैव !
सगळ्यांनाच वाटलं राहील हा पाहुणा काही दिवस. काही दिवसानंतर हा राक्षस पाहुणा निघून जाईल ;पण हे शक्य नव्हतं.कोविड १९ भलताच चक्रम व हट्टी निघाला.यात तारांबळ झाली ते शालेय मुलांची. सर्वात परवड झाली ती पहिलीच्या मुलांची. ते दुर्दैवी ठरले.ही तारांबळ जवळपास दोन वर्ष चालली.
गुरुजीची ओळख नव्हताच,शाळेत न जाताच अक्षर ओळख नव्हताच,शाळेत पहिलं पाऊल न ठेवताच पहिलीचे मुलं दुसरीत गेली. पहिल्या वर्गाबरोबरच परवड झाली ते दोन ते चार वर्गाची. लिहीण्या वाचण्याची गती येण्यापूर्वीच हे वरच्या वर्गात गेले.
तब्बल दोन वर्षानंतर १३.६ ला गुरुजी शाळेत गेले. तसे ते अधुन मधून शाळेत जात होते उदास चेहरा घेवून. भकास उजाड ज्ञान मंदितरात. वैरान माळरानात बसल्या सारखं .२०१९ ते २०२२ या दोन वर्षात गुरुजी शाळेत जाण्यासाठी बालकांना पहाण्यासाठी,त्याच्या खोड्या पहाण्यासाठी,त्यांचा खेळ,त्यांचा अभ्यास घेण्यासाठी व पहाण्यासाठी तळमळत होते.त्यांच्या मनात असून ते हे काम करू शकत नव्हते.
अखेर तो दिवस उजाडला.मी हिवळ्यात चिमण्याची शाळा पाहिली आहे.पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची शाळा पाहिली आहे.शाळेत बसण्यांची त्यांची शिस्त पाहिली आहे ; पण त्यांची शाळा भरण्यापूर्वी चिमण्यांचा चिवचिवट व बगळ्यांची चक्कर मारण्याची पद्धत काही औरचं असते.चिमणी पाखरांची शाळा भरली तर त्यांचे गुरुजी आपल्याला शोधावे लागतात.त्याचे गुरुजी वेगळ्या आसणावर बसत नाहीत.ते त्यांचा सोबत एकरूप झालेले असतात. तसंच आपले गुरुजी ही विद्यार्थी केंद्रीत शिक्षण देत ज्ञानरचनावादात विद्यार्थांत एकरूप झालेले असत पण ही संधी कोविडने हिरावून घेतली. गुरुजींचा आनंद व मुलाचं बागडणं याने ओरबडून घेतलं होतं.आनंदाच्या क्षणाची गुरुजी व त्यांची चिमणी पाखरे अतुरतेने वाट पहात होते.तो क्षण १५.६.२०२२ रोजी आला. आनंदाचा क्षण अवर्णनीय.
दिनांक १३.६ व १४.६ २०२२ ला प्रत्येक शाळेत शिक्षकांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत आगदी आनंदाने मनोभावे तोंडावर सल न ठेवाता भेदभाव न करता हेवादावांचा लवलेस बाजूला ठेवून जंगी स्वागत करण्याची तयारी केली होती.
मी माझ्या गावच्या जि.प.हा.विष्णुपूरी नांदेड या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापकांच्या आग्रहास्तव शाळेत गेलो होतो.मुलांचा चिवचिवाट पाहून मन आनंदीत झालं.शाळेला जवळपास दोन आडीच एकरच मैदान मुलांनी फुलून गेलं होतं.चिमणी फुलपाखरं याचं थवा भिरभिरत होतं. सर्व चिमुकली फुलपाखरे चिवचिवाट करत आनंदाने सारखी बागडत होती.शिक्षकांच्या हलचालीत त्यांच्या कृतीत उत्साह भरलेला होता. आज शिक्षणाचा उत्सह होता. देव भक्ताच्या भेटीला आलेले होते.प्रत्येक शिक्षक आपआपल्या वर्गाच्या मुलांत आनंदाने वावरत होते.
विशेष म्हणजे माझ्या गावची शिक्षण समिती येवढी चांगली आहे की त्याला तोड नाही.जोडही नाही .सर्व कशी तरुण उत्साही शाळेच्या कामासाठी झपाटलेली मंडळी आहे. येथे नियम आहे मंदिर, मस्जिद भंडरा यासाठी पैशे देत नाहीत.पण शाळेला भरघोष मदत करतात.
मुख्याध्यापक शिक्षकांनी मागणी करावी व ती शिक्षण समितीने पूर्ण करावी असा अलिखित नियमच झालेलं आहे.या मुळे या शाळेचं रुपडचं बदलेलं आहे. शाळेत राजकारण नाही. कोणताही पक्ष असो तो फक्त शाळेचा विचार करतो. शालेय कामात मदतीत राजकारण कोणीच करत नाही.प्रत्येक राजकीय व्यक्ती शाळेत येताना शाळेच्या गेटच्या बाहेर राजकारण,पक्षाचे वस्त्र बाहेर काढून येतो. शाळेसाठी गाव , गावासाठी शाळा हे येथील सूत्र आहे.
येथे बाराशेपेक्षा जादा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . पहिल्याच दिवशी किमान हजार मुले शाळेत उपस्थित होती.शिक्षकांचं कार्य त्यांची मेहनत व गावल्यांची मदत या मुळे शाळा कशी बदलते यांचं उत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी हायस्कूल होय.
शाळेत गेल्यानंतर थोड्यावेळाने राष्ट्रगीत झालं. प्रतिज्ञा झाली.भारतीय संविधानाची उदेशिका वाचणं झालं.आगदी उत्सफूर्तपणे भारतमाताकी जय चा जयघोष करण्यात आला .
खरी मजा प्रथमच शाळेत आलेल्याची होती. त्यांचा चेहर्यावर जेवढं आनंद होतं तेवढचं अश्चर्याचे भाव होते.त्यांचा चेहर्यावर नवलाई होती.पूर्वी पहिलीला येताना शेंबूड पुशीत जोरजोराने रडत शाळेत येत.पण ही मुलं टापटीप होती.आनंदी होती. अधुनिक युगाची ही मुले आनंदीच राहणार.
राष्ट्रगीताच्या पूर्वी गुरुजी मुलांना सावधान विश्राम म्हणत होते. विद्यार्थ्यांना डावा पाय बाजूला घ्या म्हणत होते ; पण पहिली दुसरीचे मुलंमुली दोन्ही पाय एकदाच आपटत होते. त्यातही त्यांना किती आनंद मिळत होतं !
सर्व शिक्षक आज आनंदी होते .दोन वर्षांनंतर त्यांना त्यांचे दैवत भेटत होते. विशेष करून पहिल्या वर्गाच्या शिक्षकांचा आनंद अवर्णीय होता.राष्ट्रगीत वगैरे संपल्यानतर मुलांना नविन कपडे ,नविन पुस्तकं वाटण्यात आले.गावातील पालक ,प्रतिष्टीत नागरिक शाळेत आले होते.(पूर्वी फारशे कोणी येत नव्हते)आज पहिल्या वर्गाचा पहिला दिवस .शाळेत पहिलं पाऊल. दोन वर्षापासून भकास झाल्येला शाळा.उदास झालेले शिक्षक.चिंतित असलेल्या पालकांसाठी आज आनंदाचा दिवस.
पहिलीचे मुलं वर्गाकडे वळली.सोबत त्यांच्या मॅडम. चेहर्यावर आनंद मावेना.आज त्यांना त्यांच्या दैवताची पुजा करायची होती.त्यांच्या सोबत गप्पा मारायच्या होत्या. शाळांमध्ये किती छान आनंदी वातावरण आहे हे पटवून द्यायचे होते.शाळेत सावित्री ज्योतीबाची परंपरा कायम ठेवायची होती.
शाळेचं पहिला दिवस . सवित्री ज्योतीबांची पावलांचे ठसे घ्यायचे होते. शाळेत पहिलं पाऊल पडलं हे आनंदाने सांगायचे होते .
पहिल्या पावलाच्या ठशासाठी जय्यत तयारी केलेली होती. पहिलीच्या मुलांनी वेगवेगळा मुखवटा धारण केलेला होता.यात कोणी वाघ होते.कोणी सिंह होते.यात कुणी फुलराणी होत्या.कोणी गणपती होते . कोणी ज्योतीबा होते.कोणी सावित्री.काय आनंदी वातवरण होतं.पहिल्या वर्गाला शिकवण्याऱ्या ताई यांनी सुंदर प्रवेश सेल्फी पॉईन्ट बनवलेले होते. जिप चे अधिकारी शाळेला भेट देवून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुलाच्या पहिल्या पावलाचे ठसे घेतले.त्यांच्य बरोबर सेल्फी घेतली.पहिल्याच्या वर्गाचं कौतुक केलं. त्याचं स्वागत केलं.शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे उमटवले .कधीही पहिला नाही असा विद्यार्थी प्रवेशात्सोह प्रत्येक शाळेत झाला.
समाजातील काही लोक जिपच्या शाळेला बदनाम करतात.या शाळेविषयी फारसं चांगलं बोललं जात नाही.शिक्षका विषयी आकस भावना ठेवतात.मला नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्टातील तमाम शिक्षण प्रेमी जनता अधिकारी यांना सांगायचं आहे तुम्ही एकदा विष्णुपूरीच्या जिप शाळेला भेट द्या .माझ्या शाळेचं रुप पहा.माझ्या शिक्षकांचं काम पहा.त्यांची मेहनत पहा.मग ठरवा जिपच्या शाळा खरचं मागास आहेत का? जिपच्या शाळा आता आपलं नविन रुप धारण करत आहेत.खाजगी ज्या काही चांगल्या शाळा आहेत त्यांच्या तोडीच्या होत आहेत.मला मान्य आहे काही बोटावर मोजण्या इतक्या शाळा “ड “श्रेणीत असतील मग तेथे खाजगी शाळा ही आहेत हे मी मान्य करतो .पण आज निश्चितच जिपच्या शाळांनी स्वतःच रुप कार्य करण्याची पद्धत बदलेली आहे.जुनी कात फेकून दिलेली आहे.प्रत्येक शिक्षक कार्य मग्न झालेलं आहे.कारपोरेट शाळेशी स्पर्धा करत आहेत.
शाळेतील पहिलं पाऊल दिखाऊ कार्यक्रम न रहाता जिल्ह्यातील मा. मुख्यकार्यकारी अधिकऱ्या पासून शिक्षक,शिक्षण विभागातील सर्व मोठे ,लहान अधिकारी यांनी शिक्षण मोहत्सव म्हणून साजरा केला व ते शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे.
शाळेत किलबिलाट सुरु झालं.पाखरं,फुलपाखरं परत आली.आपल पहिला पाऊल ठसा शाळेत उमठविला.चला गुरुजी तुम्ही ही आता लागा कामाला. कोठारी आयोगानुसार अधुनिक भारत चार भिंतींच्या आत घडतो आहे.ते घडवायचं काम तुम्ही स्विकारलेलं आहे.
तमात शिक्षक बांधवाना नविन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७