दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
सतत बारा वर्षापासून १००टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असुन या वर्षी सुद्धा नंदिकेश्वर माध्यमिक विद्यालय धावरी च्या दहावी चा निकाल १००टक्के लागला आहे.
नंदिकेश्वर माध्यमिक विद्यालय येथील उज्वल यशाची परंपरा राखत इंगळे निकीता शंकर यांनी95.60 टक्के गुण घेवुन दहावीत प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला आहे .द्वितीय क्रमांक निकीता रोहेजी कागणे ९३.४०टक्के तर तिसरा क्रमांक इंगळे प्रवीण केशवराव ९३.४० घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी शाळेतील 54 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यामध्ये 34 विद्यार्थी प विशेष प्रावीण्य यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये मंगल क्रांती संतोष ९२टक्के, नरवडे महादेवी शिवशंकर९१.६०टक्के, पवार शुभम धोंडीबा ९१.२०, गायकवाड शुभम बाबाराव ८९.८० टक्के वाकडे कानोपात्रा यादव ८९.६०टक्के, कल्याणकर मनीषा बालाजीराव ८९.२० टक्के गाडेकर तुळशीदास दिलीप ८९.२०टक्के भागवत प्रांजली गोपाळराव ८९.२०आदी नी गुणवंत होण्याचा बहुमान मिळाला आहे या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,संस्थेचे सचिव प्रवीण पाटील चिखलीकर,शाळेच्या मार्गदर्शिका जिल्हा परिषद सदस्य प्रणीताताई देवरे चिखलीकर, गटशिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी टेकाळे, केंद्र प्रमुख फसमले,शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम, शाळेतील शिक्षक संजय फाजगे, युनुस शेख, गणपती इंगळे, महेंद्र कापुरे,सावन इंगळे, दिलीप सुर्यवंशी, निकाते मॅडम, तेलंग मॅडम,आवीनाश पाटील पवार, गोविंद गायकवाड, सुरेश पुरजवार, सरस्वतीबाई वाकडे यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. या निकाला बद्दल
सर्व, पालक मंडळींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या एकंदरीत पाहता शाळेचे हे घवघवीत यश सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे व सर्व शिक्षकांच्या कार्याचे फलित म्हणून परिसरामध्ये सगळीकडे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
नंदिकेश्वर माध्यमिक विद्यालयांमध्ये परिसरातील रायवाडी मलकापूर आजमवाडी,धावरी, धावरी तांडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकांच्या व विद्यार्थ्यांचा कल शाळेकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे . या परिसरामध्ये नावलौकिक शाळा म्हणून त्यांनी अल्पकाळातच आपला परिचय दिला आहे त्यामुळे सर्व परिसरात विद्यार्थ्यांना कायम दर्जेदार शिक्षण मुळे शाळा प्रसिद्ध झोकात आली असल्याचेही पालक वर्गातून बोलले जात आहे या यशामुळे सर्वत्र शाळेचे कौतुक होताना दिसत आहे..