
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आत्मा स्वरूप जगणं म्हणजे अध्यात्मिक ज्ञान अवगत करून जीवनात त्याचा कृतिशील योग्य वापर करणं व शरिर स्वरूप जगणं म्हणजे अध्यात्मिक ज्ञान समजन पण कृती मध्ये मात्र न उतरण म्हणजे शरिर स्वरूप जगणं आणि सगळी दुःख हे शरिर स्वरूप जगण्यामुळेच निर्माण होतात . त्यामुळे आपली जीवनाविषयी नेमकी संकल्पना काय आहे यावर आपल्या जीवनातील अनेक बाबी अवलंबून असतात . आणि आपण त्या प्रकट कशा पद्धतीने करतो यावर त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात .
वास्तविक अंतिम सत्य जाणणे हे अध्यात्मिक ज्ञान व भौतिक वस्तू यांना सत्य माणुन जीवन जगणे म्हणजे संसार आणि हा भौतिक संसार करत असताना आपण अनेक अशा वेगवेगळया वस्तू भौतिक सुविधा, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नाते संबंध आणि त्या अनुषंगाने निर्माण होणा-या वेगवेगळ्या समस्या अडचणी यामुळे आपण आपल्या जीवनात नहक दुःख निर्माण करतो . म्हणून आपल्याला साक्षी भावाने वागता आलं पाहिजे हेच जीवनातील सगळ्यात मोठं यश आहे . सुख दुःख , फायदा, तोटा ,याचा समप्रमाणात विचार करणे तसेच मुलंबाळं , कुटुंब , नातेसंबंध ह्या सगळ्यात वावरत असताना जबाबदारी कर्तव्य आणि कर्म भाव ठेवून साक्षी भाव ठेवता आला पाहिजे म्हणजे दुःख निर्माण होऊच शकत नाही. आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडली पाहिजेत परंतु हे पार पाडत असताना निसर्गाचे संविधान आणि अंतिम सत्य याची जाणीव जागृती ठेवली तर साक्षी भाव आपोआप तयार होईल .
आपण दैनंदिनजीवना जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे व्याप वाढवते याच मुख्य कारण हेच आहे कि आपल्यला सुख समाधान आनंद शांती मिळाली पाहिजे. एवढीच अपेक्षा असते .पण हे सगळे व्याप वाढवले तरी आपण खरया अर्थाने सुखी समाधानी होतो का तर उत्तर हे नक्कीच नाही असेच आहे . कितीही भौतिक व्याप वाढवले , साधन संपत्ती आपण मिळवली तरी समाधान मात्र मिळत नाही .कारण सांसारिक जीवनातील सुख समाधान आनंद हा अशशावत आहे म्हणजे संसारीक जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे आनंद मिळतो . त्यामुळे कुठल्याही कारणाने मिळणारा आनंद समाधान हे क्षणिक असत. कारण ती वस्तू ते कारण या मध्ये काही अडचण निर्माण झाली किंवा ते संपुष्टात आले ,तर त्या माध्यमातून निर्माण झालेला आनंद समाधान संपुष्टात येणार .म्हणून भौतिक स्वरूपाच्या वस्तू रूपातुन मिळणार समाधान हे पण भौतिक च असतं . म्हणून मग वास्तविक समाधान आनंद कशा मध्ये आहे हे समजलं कि आपण जीवनात साक्षीभावाने जगतो . म्हणजे निसर्गातील घडणारी प्रत्येक घटना हे निसर्गाच्या लिखित संविधानानुसार घडते .आपली इच्छा असली किंवा नसली तरी आपण त्या मध्ये काही बदल करू शकत नाहीत . तसेच बदल करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त नाही . निसर्गाने तो अधिकार त्याच्या कडे ठेवलेला आहे हे तरी आपण मान्य करतो का तर नाही करत . आणि म्हणूनच मग आपण नेमकं दुःख कशाच आणि का बाळगतो हा मुख्य प्रश्न आहे . सगळ्यात महत्वाचे कारण हेच आहे कि जीवन आणि संसार याच्या प्रति आपल्यला साक्षी भावाने वागता आलं पाहिजे. हेच जीवनातील सगळ्यात महत्वाचे ज्ञान आहे . आणि नेमकं हेच आपल्याला जमत नाही आपली मुख्य अडचण हिच आहे . आपल्याला सदैव सुखी ,समाधान ,आनंद, राहयाच असेल तर जीवना प्रति आपल्यला साक्षी भावाने वागता आलं पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301