दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
माजलगाव तालुक्यातील जयमहेश साखर कारखान्याने २०१८-२०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाची एफ आरपीची रक्कम थकविली होती. या थकीत रक्कमेचे १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. यानंतर साखर आयुक्त पुणे यांनी ६ ऑक्टोबर रोजी जयमहेश कारखान्याला एफआरपीच्या रक्कमेवरील व्याजापोटी ८ कोटी २ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश दिले. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती भाई थावरे यांनी दिली. या प्रकरणी भाई थावरे यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.