अजय चव्हाण दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती मुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीपिकाचे नुकसान झाले असून त्यांना वाढीव दराने मदत देण्याचे आदेश मा.राज्यपाल यांनी दिले आहे.
शासन निर्णय सीएलएल-2021/प्र. क्र.258/म -3 नुसार जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या प्रचलित दरानुसार प्रति 2 हेक्टर च्या मर्यादेत 6800/- वरून 10000/- प्रति हेक्टर,. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर15000/-, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 25000/- वाढीव दर जाहीर करण्यात आले आहेत.