
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ३८ आमदार सोबत असल्याचे सहीनिशी दाखवले.
पण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या दाव्यातून हवाच काढली. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गुवाहाटीतील १० आमदारांसोबत चर्चा झाल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्राला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मजशास तसे उत्तर दिले.तसंच ३८ आमदार सोबत असल्याचा दावाही खोडूनही काढला आहे.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शुक्रवारी रात्री सुद्धा शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत आमची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदेंसोबत असलेल्या १० आमदारांनी आमच्यासोबत फोनवर चर्चा केली. आणि काय सांगता कोण कुणासोबत आहे.
या महाराष्ट्रात विधानभवनात संख्याबळ सिद्ध करू, बघू कुणामध्ये किती दम आहे दिसेल’ असं आव्हानच राऊत यांनी दिलं. ‘त्या आमदारांची सुरक्षा अजिबात सरकारची जबाबदारी नाही. ते महाराष्ट्रातून पळून गेले आहे. XXला पाय लावून पळाले आहे.
त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी रक्षक घेऊन गेले आहे. त्यांना जी सुरक्षा असते ती आमदारांना असते. कुटुंबीयांना नसते. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या, असं वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात.
महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, तुम्ही शिवसेनेचे आमदार म्हणवता ना, मग राज्यात या. असं बकरी सारखं बेबे काय करू नका. करू काही, सोडून द्या हे सगळं अजूनही वेळ गेली नाही’असं राऊत म्हणाले. ‘आमच्याकडे सांगलीचे कार्यकर्ते आले आहे फक्त आदेश देण्याची वाट पाहात आहे, हे सोपं नाही हे कोणत्या पक्षात घडत आहे.
मी जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने बोलतो, मी हवेत बोलत नाही. आमच्यासोबत काय आहे, किती ताकद आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहात,इथं येऊन बोला. कुणाची सुरक्षा काढली नाही.
ही आमची जबाबदारी नाही. त्यांचा राग समजू शकतो. आता सांगलीचे लोक आले आहे ती भडकलेली आहे. काय करू अशी विचारात आहे.
ती भडकली तर विस्फोट होईल.पण सर्वांना शांत राहण्याचे आदेश दिले आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला. ‘मी देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला देईल,ते बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे, ते चांगले खेळाडू आहे. तुम्ही यात पडू नका, आधी सकाळी झालं होतं ना. आता संध्याकाळी होईल.
तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. भाजपने जी काही प्रतिष्ठा कमावली आहे, ती धुळीला मिळवू नये. आमचे राजकीय मतभेद असले तरी चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांनी या फंद्यात पडू नये, निवडणुकीमध्ये पाहू या, उगाच तुम्ही फसाल. आम्ही आमचं पाहून घेऊ, असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.