
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना करत असलेली दादागिरी योग्य नाही, असे वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले म्हणाले आहेत.
दुसरीकडे अल्पमतात असलेले ठाकरे सरकार बहुमत कसे सिद्ध करणार, असा सवालही आठवले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत भेट झाल्यानंतर रामदास आठवले बोलत होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वाद हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, असे फडणवीस म्हणाल्याचे आठवले यांनी सांगितले. आम्ही आता वेट अँड वॉचमध्ये आहोत. एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हे सरकार अल्पमतात आहे. त्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही, असे आठवले म्हणाले.