दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांनी उन्हाळी सत्र परीक्षा या बहुपर्यायी पद्धतीने घेतल्या आहे, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या विद्यापीठाने देखील बहुपर्यायी पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मा. कुलगुरूंना केली आहे.
मा. उच्च न्यायालयाने देखील संपूर्ण महाराष्ट्रात एकच परीक्षा पद्धतीने घेण्याचे आदेश दिलेले आहेत, महाराष्ट्रातील 1.गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, 2.कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव , 3.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, 4. मुंबई विद्यापीठ, मुंबई. 5. छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 6. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या विद्यापीठांनी बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचे मान्य केले आहे, मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा का घेत नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे.
सध्या जगभरात आणि भारत देशात कोरोना महामारीचे संकट अद्यापही टळलेले नाही. आतापर्यंत तीन लाटा या जगात येऊन गेल्या आहेत आणि जग आता चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहे. एकट्या महाराष्ट्रत दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत,