दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पारंपरिक पद्धतीने साजरा
जव्हार:-आदिवासी ग्रामीण भागात कोवळी भाजी हा सण पावसाळा सुरू झाल्यानंतर आदिवासी समाजाचा पहिलाच सण असल्याने मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला जातो.साधारणतः पहिल्या पावसानंतर रानमाळावर अनेक रानमेव्यामध्ये कोळी भाजीचाही समावेश होतो.अतिशय पारंपारिक पद्धतीने आणि वडीलोपर्जित तसेच आदिवासी रीती-रिवाजाप्रमाणे चालत आलेला हा सण ग्रामीण आणि आदिवासी बांधव सुरुवातीला आपल्या ग्रामदैवताला या भाजीचे नैवेद्य दाखवून नंतरच प्रत्येक आदिवासी बांधवांच्या कुटुंबात अर्थात घराघरात साजरा केला जातो.
या सणाच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या माहेरवाशीनी आपल्या लग्नानंतरचा पहिलाच सण असल्याने अगदी आनंदाने आपल्या माहेरी येण्याची पारंपारिक प्रथा आहे.प्रामुख्याने हा सण कोणत्याही तारखेला अथवा तिथीला साजरा होत नसून वातावरणाच्या बदलानुसार बहुतेक मंगळवारीच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येत असून या दिवशी गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असे सर्वच या पहिल्या सणाचा आनंद घेऊन उत्साहाने स्वागत करून साजरा केला जातो.