दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सध्याच राजकारण हे खुप वेगवान आणि गतीशिल झाला आहे कधी कोणाची विकेट निघेल आणि कधी कोण पद भुषवेल आणि किती काळ भुषवेल हे सगळं कोणी हि सांगु शकत नाही . आणि कोण कधी मित्र होईल कोण कधी शत्रु होईल हे सांगता येत नाही हे झालं समोर दिसणार पण गुप्त मित्र आणि गुप्त शत्रू हे पण अनेक असतात .हे सगळे शत्रु विकेट काढण्यासाठी तर मित्र आपल्याला योग्य ठिकाणी पाहण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणून राजकारण हा विषय सध्या कोणीही भावनात्मक घेता कामा नये आणि राजकारण हे भावनात्मक नसतं जे प्रत्यक्ष घडत तेच सत्य असतं भावनेला राजकारणात शुन्य महत्व आहे.आणि राजकारणात जे घडत ते सगळं अदृश्य असतं पडद्याआड असतं ज्याच्या बाबातीत घडलंय त्याला पण घडल्यावर समजतं कारण या मध्ये अनेक असे दृश्य अदृश्य शक्ती कार्यरत असतात आणि अनेक आश्चर्यकारक निर्णय होतात ज्या मध्ये लोकांना विश्वास वाटत नाही .राजकारण सत्य कि असत्य ,चांगलं कि वाईट हा सर्वसामान्य माणसाच्या मानतील गहन प्रश्न तसं सर्वसामान्य माणसाच्या मनात राजकारणा विषयी अनेक असे नानाविध प्रश्न निर्माण होत असतात आणि सध्या तर सोशल मिडिया वर हजारो राजकिय विश्लेषक आहेत विश्लेषक हा मुळात निष्पक्ष असला पाहिजे पण असं होतं नाही विश्लेषक हा विशिष्ट विचारांचा पुरस्कृता असतो .मग विश्लेषक जर अगोदरच कुठल्याही एखादया विचाराने प्रभावित असेल तर विश्लेषण हे सुयोग्य येणार नाही . त्यामध्ये सत्य आणि वास्तविकता या मध्ये तफावत निर्माण होईल . राजकिय क्षेत्रात भावनेला शुन्य महत्व असत. वेळ काळ प्रसंग आणि भविष्यातील गणित या सगळ्याचा विचार आणि वेगवेगळ्या पक्षातील वजनादार नेते आपलं वजन पडद्याआड वापरून कधी कधी भविष्यातील अडचण संपुष्टात यावी म्हणून काही आश्चर्यकारक निर्णय होत असतात . नंतर हे निर्णय योग्य कसे हे पटवून देण्यासाठी स्पर्धा लागते .मग या मध्ये अनेक समर्थक नाराज देखिल होतात . वरकरणी हे आपल्याला जरी ते खच्चीकरण वगैरे वाटत असलं तरी ते पडद्याआड. अनेकांनी मग पक्षातील असो विरोधी पक्षातील असो अशा अनेक महत्वाच्या लोकांनी एकमेकांशी असणारे राजकीय संबंध जोपासून पडद्याच्या आड घेतलेला एखाद्या महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे खंर राजकारण पण लोकांना हे दिसत नाही . तो निर्णय पडद्यावर आला कि लोकांना आश्चर्यकारक धक्का बसतो . धक्का वगैरे नाही तर तो बंदोबस्त असतो भविष्यातील घडामोडींचा परंतु सर्वसामान्य लोकांच्या हे पचनी पडत नाही. सध्या राजकारण हे खुप वेगवान आणि गतीशिल झाला आहे म्हणून सर्व साधारण लोकांनी याला भावनात्मक घेता कामा नये .हिच आजच्या राजकारणाची सत्य वास्तविकता आहे.
अँड सुचिता गिते(दहीफळे)
विधिज्ञ जिल्हा न्यायालय नांदेड