दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अजित दादांनी भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीसांना चिमटे काढले.
तुम्ही भाषण केलं, पण तो जोश नाही, उत्साह नाही
फडणवीस खूपच नशीबवान आहेत केवळ अडीच वर्षात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते झाले असा चिमटा यावेळी अजितदादांनी लगावला.
तुम्ही वकील आहात, त्याच पेशातून तुम्ही एकनाथ शिंदे हे कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.देवेंद्रजी सातत्याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख करताना सातत्याने शिवसैनिक असा उल्लेख करतात मुळात एवढ्या वेळा सांगण्याची गरज का लागते?असा सवाल देखील त्यांनी फडणवीस यांना विचारला.
त्याच्यबरोबर सत्तेचा ताम्रपठ घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. देवेंद्रजी, मी तुमचं भाषण लक्ष देऊन ऐकलं.. तुम्ही शिंदेंचं एवढं कौतुक केलं, मग मागच्या मंत्रिमंडळात शिंदेंना फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं..जो नेता भारदस्त असतो, त्याला खातंही मोठं मिळतं. चंद्रकांत दादांचंच पाहा.
आजचे मुख्यमंत्री तेव्हाच एवढे सर्वगुण संपन्न होते तर तेव्हा त्यांना एक छोटंसं खातं का दिलं होतं.. तुमच्या मंत्रिमंडळात अजून एखादं खातं त्यांना का नाही दिलं.. याचा महाराष्ट्रही विचार करेल असं देखील ठणकावून सांगितलं.
शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यावर आमदार टेबलावरच नाचायला लागले. सत्ता येत असते, जात असते. पण असं वर्तन योग्य नाही या घटने नंतर शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकरांनी याबाबत खेद व्यक्त केला,कारण त्यांच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार आहेत. अब्दुल सत्तार सध्या शांत आहेत मंत्रिमंडळाचं स्थिरस्थावर होईपर्यंत जास्त बोलायचं नाही अशी भूमिका बऱ्याच आमदारांनी घेतलेली दिसते.
शिवसेना नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते जात नाहीत
आणि गेलेले आमदार पुन्हा निवडून येत नाहीत, हा इतिहास आहे, असं सांगताना अजितदादांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांचा नामोल्लेख केला. त्याचबरोबर नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाहीत हा इतिहास आहे.
येत्या निवडणुकीत ते दिसेलच पण एका गोष्टीचं कुतुहल, ज्या वेळेस भाजप-शिंदे गट सरकार स्थापन करायचं ठरवलं, त्यावेळी १०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, ४० आमदाराची व्यक्ती मुख्यमंत्री होते.. त्यात नक्की काही तरी काळंबेरं आहे.
यापुढे बोलतांना अजितदादा म्हणाले की शिंदे साहेब आपण खाजगीत बोलत होतो, पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास खात्याला अजून निधी देण्याचा मी शब्द दिला होता त्यानुसार अजून १ हजार कोटी रुपये मंजूर करून देऊ असं देखील सांगितलं होत.सर्व खात्यांना पुरेसा निधी दिला.
शिवभोजन थाळी केंद्राच्या वेळीही शिवसेना आमदारांच्याच सर्वाधिक शिफारशी मान्य केल्या.
राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला असा पाढा अनेकांनी वाचला मी काम करताना भेदभाव कधीच करत नाही
आमदार निधी मीच २ कोटी रुपयांवर नेला त्यानंतर त्यात आणखी ३ कोटींची भर घालून २८८ आमदारांना प्रत्येकी ५ कोटी विकास निधी देखील अर्थमंत्री या नात्याने दिला.
कसलाच भेदभाव केला नाही. तुम्ही सातत्याने अन्याय केला असं का म्हणता? असा सवाल या ठिकाणी अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
आज विधानसभेत अजितदादांनी शिंदे गटाने केलेल्या प्रत्येक खोट्या टीकेला पुराव्यासाठी उत्तर दिलंय.
सत्ता असो किंवा नसो कायम तोच दरारा आणि तोच रुबाब…!! अजितदादा