दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवी सरकार इंगळी
हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातून पंचग़गा व कृष्णा नदीला गेल्या चार पाच वर्षापासून महापूराने नागरीक हैरान झाले आहे.१५जुलै ते १०आॉगष्ट या कालावधीत मुसळधार पावसाने झोडपले जाते.आणि हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेकडो गावे पाण्याखाली जातात.जनजीवन विस्कळीत होते. मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते.प्रापंचिक वस्तूचे नुकसान होत असते.हजारो कुंटूंबाना स्थलांतरीत व्हावे लागते.
या वर्षी वळवाचा पाऊस हवा तेवढा झाला नाही.तसेच मिरग नक्षत्र कोरडा गेला.त्यामुळे पिकांची पेरणी ही पुर्ण शेतकरी यांनी केली नाही.पावसा अभावी पेरणी राहीली आहे.मात्र कालापासून शिरोळ आणि हातकणंगले तालुका व कोल्हापूर परीसरात पाऊस जोर धरल्याणे पंचगंगा नदीवरील जवळपास ६ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन दिवसात पाण्याची पातळी जवळपास २४फुटाणी वाढली असून पाणी पंचगंगा नदीपात्रा बाहेर पडलेने.नागरीकांना सतर्क राहणेचा प्रशासनाकडून इशारा देणेत आला आहे.वळीव व मिरगाचा पाऊस न पडलेने तो कालापासून पुन्हां आलेने व नदीचे पाणी पातळी वाढत असलेने नदी काठच्या नागरीकांची धाकधूक वाढली आहे.