दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : आदित्य ठाकरे म्हणाले की, ”जे आमदार शिवसेनेतून गेले मी त्यांना बंडखोर म्हणणार नाही, बंड करण्यासाठी हिम्मत लागते. ते आजही राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्यास, आम्हीही तयार आहोत. यात आम्ही सर्व जागा जिंकू. तसेच महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच असल्याची शक्यता दिसत आहे आणि ती लागणारच, आम्ही यासाठी पूर्णपणे तयार आहोत.” तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच असं म्हटलं होतं.