दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल पण शिवसेना कधीच संपणार नाही, असाही सणसणीत टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.
शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही आणि त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं बंडखोरांवर टीका केली आहे. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. बहुमत जिंकले, महा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे!, अशा शब्दांत सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.