दै.चालू वार्ता अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ राजेश भुस्से
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन 2021-2022 अंतर्गत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने निवडून आलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व सरपंच यांना प्रशिक्षण दिले व तीन दिवसीय प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात आले.ग्राम विकास सामाजिक आर्थिक सेवाभावी संस्था वसंत नगर नांदेड. यांनी आयोजन केले व सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज येथे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला व जेवण्याची, राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी सतीश पाटील पांगरिकर, विजय पाटील भुस्से, अमोल डोंगरे, राजेश लोणे, पांगरी च्या सरपंच सौ.गंगासागर सतीश कदम, लोणी बुद्रुक च्या सरपंच सौ वैष्णवी विजयकुमार भुस्से, आंबेगाव च्या सरपंच सौ सुरेखा अमोल डोंगरे, लोणी खु च्या सरपंच श्रीमती अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे, बारसगाव च्या सरपंच खंडागळे व इतर गावातील सरपंच मंडळी उपस्थित होते.