दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर प्रतिनिधी:-शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो.सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो.शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने वंचित समाजाचे राजे होते.असे मत सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल,रुद्धा ता अहमदपूर येथे आयोजित राजश्री शाहू महाराज जयंती कार्यक्रमात संचालक कुलदीप हाके यांनी मांडले.
राज्यश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे संचालक कुलदीप हाके व संचालिका शिवालीका हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य रूथ चक्रनारायण, शुभांगी सूर्यवंशी, सय्यद नवाल, शुभम पोले, भरत कानवटे, वैजनाथ धुळगुंडे, स्वामी ज्योत्स्ना, स्नेहा ओझा,चंद्रकला, सौ महाजन,अंगद,केशव तोंडारे, भागवत बेद्रे इत्यादी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.