दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
यता यता जेलू मंगलेदारी
आयावं आमची बसली होती पायरीवरी
आयावं आयावं काय करतस ?इचारल मी ती
तरक्या ! यो पाऊस किती कोसळतय सकाळ धरती?
पावसाचं काय बाबा, त्याचं पराच दिवस हाईत,
पून आपल्याला घरत बसाच जन्मान नाय म्हाईत…
किती वारा पाऊस असला तरी डोक्यावर घेऊन इरला,
शेतकरी राजा आगरी माझा शेताव जाऊन भिरला…
कष्ट करून चिखलानं पिकवला पिवळा धम्मक भात,
‘एस.इ.झेड,’जे.एस. डब्लू,’ दास ‘ करील आता घात…
मगुन सांगतय पोरा,यकच ध्यानात ठेव,
सातबारा तुझे नावाचा, कंपनीला नको देव,
सातबारा तुझे नावाचा , कंपनीला नको देव….
कवी – किरण सुधाकर पाटील
मु.पो.मोठे शहापूर
ता.अलिबाग .जि.रायगड