दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
आजच्या धावत्या जगात वाहन ही गरज बनली आहे. प्रत्येक कुटुंबात किमान एक वाहन आज आपल्या निदर्शनास येत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये चार चाकी बरोबरच दुचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रस्त्यावरील अडथळे पार करीत चालकाला वाहन चालवताना कसरत करावी लागते. वाहन चालवताना चालकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळी अपघाताला केवळ वाहनचालकाचा हलगर्जीपणाच प्रत्येक वेळी कारणीभूत असतो असे नाही .तर काही वेळा रोडवरती चालणारे प्राणी, नागरिक ही कारणीभूत असतात. यासाठीच वाहन चालविताना प्रत्येकाने योग्य ती दक्षता घेण्याची गरज असून व वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
यासाठी आज मोडनिंब येथे महामार्ग पोलिसांच्या वतीने आषाढी वारी -२०२२ निमित्त पंढरपूर येते पालखी व दिंड्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना महामार्गावर वाहतूक अडथळा होणार नाही तसेच अपघात होणार नाहीत यासाठी वाहन चालक, मोटार सायकल स्वार,पादचारी व वारकरी यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली, व हे सर्व कर्मचारी वारकऱ्यांन बरोबर भक्तीमय वातावरणात दंग झाले होते, त्यांनाही आज साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटत होते.
यावेळी ए. पी. आय. विजय गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन सोनार, पोलीस हवालदार गणेश शिंदे, अभिजित मुळे, पोलीस शिपाई रामेश्वर पवार व कर्मचारी उपस्थित होते.