दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली ता.इंदापूर येथे महात्मा फुले विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज तर्फे सुरू करण्यात आलेले कृषि सल्ला केंद्रातील कृषि दुतांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पालेभाज्या व फळभाज्या जागरूकता कार्यक्रम २०२२ -२३ अंतर्गत शेटफळ हवेली येथे निर्यात क्षम फळभाज्या व पालेभाज्या यांचे पॅकिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट आणि शॉपिंग याचे प्रात्यक्षिक कृषि दुतांमार्फत शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.जी नलावडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस एम एकतपुरे , प्रा.एस. मस्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार कृषि सल्ला केंद्रातील कृषि दूत विशाल शिंगाडे ,अरबाझ शेख ,वेदांत पाटील, अभिषेक तावरे ,महांतेश कणकणवाडी, सौरभ चौरे आणि लिंगराज चनागोंड यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे बचत गट तयार करून अथवा शेतकरी कंपनी तयार करून त्यामार्फत सर्व फळभाज्या व पालेभाज्या एकत्र करून त्यांना वेगवेगळ्या बाजारपेठा ,सोसायट्यांमधून, उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करणे त्यासाठी शहराच्या ठिकाणी भाज्यांचे केंद्र निर्माण करणे याविषयी कृषीदूतांमार्फत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी सर्व कृषि दुतांनी मालसंकलित करणे, पॅकिंग करणे, लेबल लावणे व तो केंद्रावर पाठवणे याकरिता मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रत्यक्ष कृती करणारे शेतकरी श्री. अविनाश दादा शिंदे यांनी पुणे येरवडा येथील हरी गंगा सोसायटी सुरू केलेल्या फळभाज्या व पालेभाज्याच्या केंद्र विषयी माहिती दिली त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले असल्याने भविष्यकाळात आपल्या पालेभाज्या व फळभाज्या यांना चांगला भाव मिळेल याची खात्री होण्यास मदत झाली.