दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती हा दिसायला सारखाच असतो . आपण त्याच मुल्यमापन कसं करतो त्यावर आपली प्रगती अधोगती, किर्ती,अपकिर्ती,हित लाभ, दुःख आनंद, वेदना त्रास अशा अनेक प्रकारचे फायदे तोटे अवलंबून असतात . म्हणून मुल्यमापन चुकता कामा नये .दिसत तसं नसतं .हा नैसर्गिक सिद्धांत आहे.आपण कशाला काय समाजावे हे सर्वस्वी आपल्या स्वतः वर अवलंबून असते या संदर्भात कोणीही आपल्या वर कोणताही प्रत्यक्ष अ प्रत्यक्ष प्रभाव निर्माण करू शकत नाही .आपण आपल्या विवेका नुसारच मित्र शत्रु तात्कालीन परिस्थितीमध्ये निश्चित करतो . तदनंतर काही कालावधी नंतर मात्र या मध्ये बदल होऊन मित्राचा शत्रु व शत्रु चा मित्र होऊ शकतो .मग असं काय घडलं कि हा बदल झाला तर काही च घडलं नाही आपण सुरवातीला च मुल्यमापन करण्यात चुकलो होतो . गारगोटी हि गारगोटी च असते ती फक्त दिसण्या पुरती हिरा दिसु शकते या मध्ये शंका नाही परंतु गारगोटीला तिजोरीत ठेवले अगदी कुठेही ठेवले तरी हि गारगोटी हिरा होऊ शकत नाही आपलच मुल्यमापन चुकत म्हणून आपण गारगोटी ला हिरा समजतो .जसं हिरा आणि गारगोटी हि दिसायला सारखीच असते परंतु फारक असतो मुल्यमापनाचा .तसंच आपल्या जीवनात येणार्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने अनेक लोक आपल्या संपर्कात येत असतात त्यातील काही लोक अगदी आपल्या मध्ये असणारे कलागुण वापरून तसेच वेगवेगळे प्रकार करून आपल्या खुप जवळ येतात परंतु ते आपल्या साठी हितकारक निघतील किंवा आपल्यासाठी लाभदायक असतीलच असं नाही किंबहुना नसतातच त्यापैकी काही आपलं हित करतात तर काही आपलं प्रचंड नुकसान करतात म्हणून आपल्या संपर्कात येणा-या प्रत्येक व्यक्ती हा कशापदधतीचा आहे हे मुल्यमापन आपल्यला सुरवातीला समजणं खुप महत्वपूर्ण आहे.आपण आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्ती च मुल्यमापन करण्यात जर चुकलो तर मग मात्र आपलं आतोनात नुकसान होऊ शकत . वास्तविक हिरा आणि गारगोटी हि दिसायला सारखीच असते.पण फारक हा असतो तो हा मुल्यमापनाचा आणि चुकलं कि आयुष्य बराबाद होत . म्हणूनच मुल्यमापन हे खुप महत्वाचे आहे ज्याला मुल्यमापन कळलं त्याला जीवन समजलं आणि ज्याचं मुल्यमापन चुकलं त्याच आयुष्य बिघडलं एकंदरीत घडण आणि बिघडण हे मुल्यमापनावर अंवलबुन असत . म्हणून वेळ काळ परस्थिती हि कोणतीही असु द्या कशीही असु गारगोटी आणि हिरा दिसायला सारखाच असल्याने नजर धोका खाते . पण मुल्यमापन धोका खाऊ शकत नाही म्हणून योग्य मुल्यमापन करायला शिकलं पाहिजे. आपल्याला जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं आपल्या संपर्कात वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतात त्यातील काही माणसांमुळे भविष्यात आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो किंवा आपलं कधीच भरून निघणार नाही असं नुकसान पण होऊ शकत . याचा अर्थ आपल्या संपर्कात येणारे सगळेच आपल्यला अहितकारक असतील असं नाही काही हितकारक सुद्धा असतील म्हणून आपल्यला योग्य मुल्यमापन करता आलं पाहिजे आणि योग्य मुल्यमापन करता आलं तर आपल्याला गारगोटी आणि हिरा हा फरक लक्षात येऊ शकतो आणि आपल्या जीवनातील होणा-या नुकसाना पासुन आपण आपल्या योग्य प्रकारे वाचवु शकतो.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301