दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रत्येकजण स्वतः च व्यक्तिगत चरित्र निर्माण करण्यासाठी नावलौकिक निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट मेहनत घेत असतो .धडपड करत असतो या मध्ये काहीच गैर नाही परंतु जसं आपण स्वतः साठी प्रयत्न करतो .तसं आपण आपलं गाव आपला जिल्हा राज्य व पर्यायाने देशाचा नावलौकिक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे . म्हणजेच राष्ट्रीय चरित्र निर्माण झाल पाहिजे . आणि यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे . परंतु असे प्रयत्न करताना आपण दिसत नाही. किंवा तशी कल्पना सुद्धा आपल्या मनात निर्माण होत नाही. हे आपल्या सगळ्यांसाठी खेदाची बाब आहे . वेळोवेळी येणारी शासन व्यवस्था अनेक असे नियम तयार करुन राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात .परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने खो देण्याचा पळवाट काढण्याचा प्रयत्न आपणच करतो . परंतु शासनापेक्षा आपण नागरिक म्हणून आपल्या देशाचं राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे .
व्यक्तिगत चरित्र निर्माण झाल्याने व्यक्तिसह देशाचा नावलौकिक होतो . मागिल कालखंडात आपल्या देशाने अनेक असे व्यक्तिगत चरित्र निर्माण होऊन जागतिक स्तरावर आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे . कुठलच कार्यक्षेत्र शिल्लक नाही कि त्या क्षेत्रात भारतीय व्यक्तिने आपलं नाव लौकीक निर्माण केला नाही. ज्या पद्धतीने व्यक्तिगत चरित्र निर्माण झाले त्याच तुलनेत राष्ट्रीय चरित्र सुद्धा निर्माण होणं अपेक्षित होते .सार्वजनिक ठिकाणी वावरताना जी समय सुचकता आणि विवेक यानुसार आचरण होणं अपेक्षित असतं तसं आचरण आपणं करत नाही.आपण जसं स्वतःच्या घराची काळजी घेतो. शिस्त पाळतो म्हणजे शिस्त बद्ध आचरण करतो परंतु हिच बाब आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरत असतो . तेव्हा मात्र आपण कळत न कळत पाळत नाही . किंवा तसं आपल्या कडुन काटेकोर पालन होत नाही जसं बस किंवा ट्रेन मध्ये चढताना उतरताना जागा मिळेल किंवा नाही मिळणार पण प्रत्येकाने स्वयंशिसत म्हणून अगदी रांगेत कुठल्याही परिस्थितीत रंग न तोडता चढ उतार केला पाहिजे. आणि याच पद्धतीने धार्मिक ठिकाणी , मॉल्स मध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी स्वयं शिस्त निर्माण होण्यासाठी प्रयत्न होण गरजेच आहे.आणि यासाठी राष्ट्रीय चरित्र महत्वाचं आहे.
राष्ट्रीय चरित्र म्हणजे काय तर एखाद्या देशातील सर्व नागरिक देशहिताच्या दृष्टीने देशाच्या गौरवशाली परंपरेत भर घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आचरण करत असताना अलिखित अशी एखादी सवय नियम ज्यांचं पालन करताना कुठलाही कायदा नियम किंवा बंधन नसताना स्वयं स्फूर्तीने आचरण करत असतात अगदी देशातील वेगवेगळ्या प्रांतातील नागरिक जे वेगवेगळी बोलीभाषा बोलताना दिसतात परंतु सार्वजनिक ठिकाणी वावरताना अगदी स्व इच्छेनुसार कुठल्याही नियामाची भिती न बाळगता कर्तव्य म्हणून पालन करतात याला राष्ट्रीय चरित्र म्हटलं जातं आणि ह्या पद्धतीच राष्ट्रीय चरित्र आपल्यला जगातील अनेक देशांमध्ये भ्रमण केल्यानंतर लक्षात येईल थोडक्यात काय तर प्रत्येकाला सार्वजनिक ठिकाणी स्वयं शिस्त हि लागली पाहिजे . परंतु या मध्ये आपण कुठेतरी अजुनही आपल्याकडे सुरवता झालेली नाही किंवा तशा पद्धतीच्या संकल्पना अनेक पुढे आल्या परंतु दुर्दैवाने याला शंभर टक्के यश मिळालं नाही हे आपल्या सगळयांच दुर्भाग्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.व्यक्तिगत चरित्र निर्माण होणं गरजेचं असत.कुठलयाही लोकशाही व्यवस्था असणार्या देशातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी स्वयंशिसत निर्माण होणं हे त्या त्या देशाच जागतिक पातळीवर एक वेगळ्या प्रकारच नावलौकिक होत.महणुन देश हितासाठी प्रत्येकानं आपापल्या जीवनात कायदा नियम यापलिकडे जाऊन काही शिस्ती स्वयं शिस्त म्हणून स्वीकारल्या पाहिजेत हि वेळेची आवश्यकता पण आहे . म्हणून प्रत्येकाने राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301