दैनिक चालु वार्ता
पन्हाळा प्रतिनिघी शहाबाज मुजावर
सामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना अटक, सुटका बाजारभोगाव , पाटपन्हाळा ता . पन्हाळा येथील गट क्रमांक ६०१ मध्ये शासकीय परवानगीशिवाय प्रतिष्ठापित केलेला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सामंजस्याने व सन्मानाने काढून घेतला. गट नंबर ६०१ मधील समाज मंदिर पाडणाऱ्या मूळ मालक व समाज मंदिर बचाव कृती समितीतील वादाचे पर्यवसान आज पुतळा उभारण्यात व काढून घेण्यात झाले . यावेळी बंदोबस्त तैनात केला होता . कृती समितीतील २९ जणांवर कळे पोलीसांत गुन्हा दाखल झाला . त्यात १० महिलांचा समावेश आहे . युवराज शामराव कांबळे , शामराव दगडू कांबळे , रामचंद्र नाथा कांबळे , राजीव जयसिंग कांबळे , चंद्रकांत तुकाराम कांबळे , आनंदा शिवाजी कांबळे , श्रीपती तुकाराम कांबळे , रवींद्र कृष्णात कांबळे , सतीश बळवंत कांबळे , प्रकाश शामराव कांबळे , शारदा अनिल कांबळे , मयुरी . राजू कांबळे , शैलेजा सागर कांबळे , माधुरी सतीश कांबळे , आक्काताई शामराव कांबळे , नेहा रवींद्र कांबळे . आक्काताई शंकर कांबळे , जयश्री गजानन कांबळे , प्रियांका श्रीपती कांबळे , कविता चंद्रकांत कांबळे ( सर्व रा.पाटपन्हाळा ) , डॉ. सुनील पाटील ( कोडोली ) , संतोष सूर्यवंशी संघर्ष बंहुजन सेना संस्थापक अघ्यक्ष (कोतोली) या सर्वाना अटक करून सुटका करण्यात आली .दोषींवर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती . सात दिवसांची मुदत देऊन सत्याग्रह करणार असल्याचे सांगितले होते.त्यानंतर पाठपुरावा केला असता हे प्रकरण तहसीलदारांकडे पाठविल्याचे समजले.तहसीलदार , प्रांताधिकारी व कळे पोलिस यांनी दुर्लक्ष केल्यानेच पुतळा प्रतिष्ठापित करावा लागला . प्रशासनाकडून कारवाईला दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ , समाजमंदिर जागेवर आज सकाळी कृती समितीने ,डाॅ बाबासाहेब आंबेडकर , व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना केली . मूळ जागा मालक यांच्या कुटुंबीयांची कृती समितीतील काहींशी बाचाबाची झाली . घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांचे पथक घेवुन दाखल झाले . दरम्यान शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र साळुंखे , पन्हाळा पोलिस निरिक्षक अरविंद काळे , गगनबावडाचे रणजित पाटील ,नायब तहसीलदार विनय कौलवकर , मंडल अधिकारी बी.एस खोत विस्तार अधिकारी पी.डी पुर भोसले , तलाठी एकनाथ गंभीरे आदी दाखल झाले . शीघ्र कृती दलाची म्हणही मागवली . पुतळा सन्मानाने काढून घेण्याबाबत प्रशासन तर पुतळा ठेवण्याबाबत कृती समिती आग्रही होती.सायंकाळी प्रांताधिकारी अमित माळी,तहसीलदार रमेश शेंडगे,सरपंच संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.घटनेचे गांभीर्य समजावून सांगून प्रशासनाने सन्मानाने व सामंजस्याने पुतळा हलविला . ग्रामसेवक संतोष खोचगे यांनी फिर्याद दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे अधिक तपास करीत आहेत .