दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बुलडाणा प्रतिनिधी:- जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाची लागवड केली जाते त्यामुळे कापूस पिकाला रासायनिक खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. असं असतांना मात्र पेरणी होऊन लगभग एक महिना उलटून गेला तरीही बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही रासायनिक खतांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे तोच तुटवडा भासु नये यासाठी जिल्हयात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं तात्काळ उपलब्ध करा अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष शुभम घोंगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, रविकांत तुपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यामध्ये खरिप हंगामाच्या पेरणीला सुरूवात होऊन एक महिना त्यातच आतापर्यंत नामांकित कंपन्यांच्या बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषीकेंद्र चालकाकडे मोठी कसरत करावी लागली आहे. त्यातच आता रासायनिक खते मिळविन्यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामध्ये १०:२६:२६,१२:३२:१६,१८:१८:१०,२०:२०:००:१३,१६:१६:१६, डि.ए.पी., पोटॅश इत्यादी रासायनिक खतांचा तुटवडा संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाल्यामुळे तोंडाशी आलेली अपूर्ण पेरणी करायची कशी? आणि निघालेल्या पिकांना द्यायचं तरी काय हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांनाच तुटवडा भासत असल्यामुळे कृषी केंद्र चालक देखिल याचा गैर फायदा घेत आहे शेतकर्यांच आर्थिक शोषन करत आहे.अशा कृषी केंद्र चालकांवर कठोर कार्यवाही करुन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व जिल्ह्यात भासत असलेला तुटवडा तात्काळ भरुन काढावा अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्या वतिने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष शुभम घोंगटे पाटील, चेतन पाटील, विशाल घोंगटे आदिंच्या स्वाक्षऱ्या अआहेत.