दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती सातत्याने बिघडत आहे. माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या लोकांच्या पाठीशी उभा आहे.
त्याने संकटकाळात भारताने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.
सनथ जयसूर्या यांनी एएनआयला सांगितले की, मला वाटते की सर्व देश श्रीलंकेत काय घडत आहे याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. श्रीलंकेत एकदा स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर, भारत आणि आमचे सर्व मित्र देश आम्हाला नक्कीच मदत करतील. या संकटाच्या सुरुवातीपासूनच भारत आम्हाला मदत करत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. श्रीलंकेच्या संकटात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सनथ जयसूर्या भारताचे आभार मानून लंकेचा राष्ट्रपती होण्याच्या तयारी करत आहे. इतरांच्या तुलनेत या आंदोलनात सूर्या जास्तच ॲक्टिव दिसत आहे त्यामुळे अशा चर्चांना जोर आला आहे.