दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
दि-०८/०७/२०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाच गाव म्हणजे बलध्याचा पाडा या शाळेला सकाळ पासूनच कुलूप ठोकलेलं होत या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिजिट दिल असता शाळेला कुलूप बघून संताप आला त्यांनी गावातील शाळे शेजारील घरांच्या काही व्यक्तीना विचारल असता सर म्हणे कधी येतात कधी येत नाही मुळात कुठलीही शासकीय सुटी नसताना व त्या शाळेवर दोन दोन शिक्षक असताना शाळा बंद कसी ठेवली शासकीय नियमा नुसार जर दोन्ही शिक्षकांना सुटी हवी असल्यास त्या शाळेवर दुसरा शिक्षक सोपवला जातो परंतु इथे शाळा ही शिक्षकांच्या घरचीच आहे असं वाटायला लागलय वरील शाळेतच ही घटना नसून मोखाडा तालुक्यातील ज्या कान्हा कोपऱ्यात शाळा आहेत ह्याही शाळेंवर असच चालत या गोष्टी मुळे पालक आपल्या मुलांना गावात शाळेत नटाकत आश्रम शाळे मध्ये टाकतात या घटनेची सदर चौकशी करून गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी या शाळेतील शिक्षकांवरती योग्य ती कार्यवाही करावी अशी गावातील नागरिकांनी ईच्छा व्यक्त केली आहे वरील घटनेला अनुसरून गटशिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याशी सम्पर्क साधला असता होऊ शकला नाही.