दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सृष्टीच्या रचनेत संसार हा महत्वपूर्ण विषय या विषयामध्ये काय फल काय निष्पत्ती हे प्रत्येकाच्या ज्ञानावर अवलंबून आहे . संसाराचा वारसा हा संपत्ती चा असतो . परंतु संस्काराचा वारसा प्रमाणिक पणाचा वसा जो पुढे नेतो तो संसारात कृतकृत्य होतो .आपली समाजातील ओळख हि आपल्या कडे असणार्या संपती वरून किंवा आपण धारण करत असलेल्या पदावरून होत असती हे सत्य आहे परंतु अर्धसत्य आहे कारण आपली हि ओळख खुप क्षणिक असते . म्हणजे जोपर्यंत धनसंपदा आहे किंवा धारण केलेलं पद आहे तोपर्यंतच हि ओळख टिकुन असती .हि संपदा संपुष्टात आली किंवा पद गेलं कि ती निर्माण झालेली पोकळी सारखी ओळख संपुष्टात आली म्हणून समजा. परंतु संस्कार आणि प्रमाणिकता याचा वसा आणि वारसा घेऊन निर्माण झालेली ओळख तहयात कायमस्वरूपी व आपल्या हयाती नंतर सुद्धा टिकुन राहते . म्हणजे पिढ्यानपिढ्या जी ओळख कायम टिकुन राहते ती ओळख संस्काराची व प्रमाणिक पणाचा असते . म्हणून सगळ्यात उत्तम मौल्यवान संपत्ती म्हणून संस्काराचा उल्लेख होतो . कुठल्याही संपत्तीने खरेदी करता येत नाही चोरी होत नाही किंवा चोरीला जात नाही ती बाब म्हणजे संस्कार आणि कुणालाही सहजासहजी जपता येणार नाही.किंवा शक्य होणार नाही . असा वसा म्हणजे प्रमाणिकपणा आणि हा वसा व वारस हा सहजासहजी मिळण किंवा मिळवणं शक्य होत नाही प्रथा , परंपरा ,रूढी याला छेद देऊन फक्त संस्कारा आणि प्रामाणिकता याचा वरसा आणि वसा कोणिही आपल्या गुणवत्तेवर चालवु शकतं यासाठी भौतिक वारस होण्याची आवश्यकता भासत नाही .पिढ्यानपिढ्या चालत आलेली वंश परपंर, धनसंपदा , नातेसंबंध नैसर्गिक नियमानुसार पुढे चालवण म्हणजे आपण याला सर्वसाधारण पणे वारसा असं संबोधतो . आणि अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या व्यक्ति आपल्या रक्तं नात्यांच्या बाहेरील व्यक्तिला सुद्धा आपला वारसा हक्क देऊ शकते.तर एकंदरीत काय तर जो दाता आहे त्याच्या मतानुसार आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाते याला आपण वारसा हक्क समजतो . पण याला अपवाद हा कि संस्काराचा वारसा आणि प्रामाणिकपणाचा वसा आपण कोणालाही देऊ शकत नाही . आणि हा वसा आणि वारसा परंपरेनुसार नाही तर गुणवत्तेवर आधारित कोणीही चालवु शकतं.वसा आणि वारसा ह्या जीवनातील सगळ्यात महत्वपूर्ण बाबी आहेत. आपण अनेक नामांकित किंवा सर्वसाधारण लोकांच्या तोंडुन ऐकत असतो मी यांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आहे किंवा चालवणार आहे. असा नम उल्लेख होणा-या महान थोर व्यक्तिमत्वांची संख्या अल्प आहे. कारण हा वसा आणि वारसा पाहिजे तेवढा सहज सोपा नसतो . त्यासाठी खुप मोठी तपस्या साधना पुर्ण करावी लागते म्हणून तर संसकारचा वारसा आणि वसा प्रमाणिक पणचा असतो . सत्याचा , न्यायचा, धर्माचा असतो, आणि यासाठी आर्थिक सदन असण्याची आवश्यकता नाही तर आध्यत्मिक ज्ञानाने आपण किती सदन आहेत त्याची आवश्यकता आहे . म्हणून संस्काराचा वसा आणि प्रमाणिक पणाचा वारसा पुढे चालविण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी आध्यत्मिक दृष्टीने सदन संपन्न असण्याची आवश्यकता आहे. आणि हि संपदा खुप सहज सोपी असल्याने आपण मिळवु शकलो तर जन्म सार्थक झाल्याचं समाधान मात्र नक्कीच आपल्याला मिळु शकत.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301