दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वा.कराळे
जिल्ह्यातील पूर्णा जंक्शन शहरालगतच्या रेल्वे पूलाखालचा रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता. परिणामी नागरिक व वाहनधारकांना रहदारीसाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. याविरोधात दैनिक चालु वार्ताने आवाज उठवून ही बाब परभणीच्या जिल्हाधिकारी तथा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली असता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ दखल घेतली.
त्यांच्या आदेशानुसार खडबडून जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने जलमय झालेला रस्ता तात्काळ मुक्त केला.
परभणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, महसूली यंत्रणा, अधिकारी, अन्य कर्मचारी व पदाधिकारी आदींनी यंत्र सामग्री व कर्मचा-यांचा लवाजमा सोबत घेऊन जलमय रस्त्यावरचे पाणी घालवण्याचे काम तातडीने हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले. त्यामुळे नागरिकांना पूरता दिलासा मिळाला आहे.
दै. चालु वार्ताच्या वृत्ताची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांनी सदर जलमय रस्ता वाहतुकीस मुक्त करण्याचे निर्देश दिल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.