दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
नांदुरा: दि.१५. केंद्रीय मंत्र्यांनी ज्या उद्देशाने राज्य महामार्गाची निर्मिती केली ते साध्य करण्यासाठी राज्य महामार्गाचे काम उत्कृष्ट दर्जाचे कसे होईल याकडे लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नांदुरा,मोताळा राज्य महामार्ग (क्रमांक १९६ ) रोडचे काम चालू असून पूर्वत्वास जात आहे. सदर रोडचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून रोडवरून वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच रोडवर वरुड फाटा असून त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाले आहे.आता पावसाळ्याचे दिवस आहे. परंतु तरी सुद्धा या अल्पशा पावसामुळे नवीन रोडचे काम चालू असून रोडला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या (१९६ नंबर राज्य महामार्ग ) रोडच्या कामाचे अवघ्या काही महिन्यातच पितळ उघडे पडले आहे.
नांदुऱ्याकडून मोताळ्याकडे जात असताना मोठा टर्निंग पॉईंट असल्यामुळे अगोदरच अपघातास निमंत्रण आहे. तांदुळवाडी /वरूड शिवारात साधारण एक ते दीड किलोमीटर पर्यंत असलेल्या दोन्ही पूलांच्या मधोमध भराव मोठ्या प्रमाणात झाला(२०/२५ फुटापर्यंत) असून रोडचे दबाई काम व्यवस्थित झाले नसल्यामुळे मुरमाचे प्रमाण कमी असून रोडच्या कडेला मातीचा भराव मोठ्या प्रमाणात असून पांढऱ्या लाईन पासून रोडला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत,व भराव सुद्धा मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. यामुळे वाहनधारकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गावाच्या विकासातील महत्त्वाचा घटक म्हणून मानल्या जाणाऱ्या दळणवळणातही अडचणी निर्माण होतील.याची दखल राज्य महामार्ग विभागाने घेण्याची मागणी होत आहे. खरंच राज्य महामार्ग दखल घेईल काय?.