दै चालू वार्ता
खंडाळी प्रतिनिधी
राठोड रमेश पंडितराव
खंडाळी :- दि २४ / १० / २०२१ वार रविवार रोजी वसंतराव नाईक चौक उदगीर .तालूका .उदगीर जिल्हा. लातूर येथे मेळावा घेण्यात आला बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या : विकासासाठी सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्यात बंजारा समाजाचे ९० लाख मतदार आहेत. राज्यातील ७० मतदारसंघांत बंजारा गोरमाटी मतदार जे ठरवतील, ते होऊ शकते. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे बंजारा समाजाने एकत्र येऊन विकासासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी वनमंत्री आ. संजय राठोड यांनी रविवारी उदगीर येथे सांगितले .
येथील वसंतराव नाईक चौकात उदगीर व जळकोट तालुक्यांतील बंजारा समाजाच्या आयोजित
तांड्यांचा विकास करणार : राज्यमंत्री बनसोडे…
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकून राहावे, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणलेला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीच त्यावेळी राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील २६ तांड्यांना जाणारे रस्ते, अनेक तांड्यांवर सभागृह मंजूर करण्यात आले आहेत. यापुढील काळात मतदारसंघातील सर्व तांड्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड होत्या. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी कृषी सभापती बापूराव
राठोड, माजी जि. प. सदस्य रामराव राठोड, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, युवा इंटक काँग्रेसचे संदीप राठोड, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय राठोड, प्रकाश राठोड, संजय पवार, डी.
सी. राठोड, श्रीधर राठोड, शिरीष राठोड, अजित राठोड, किरण नायक ,विलास राठोड, सय्यद ताहेर हुसेन उपस्थित होते.
आ. संजय राठोड म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही बंजारा समाजाचे तांडे, वस्त्या अद्यापही विकासापासून कोसो दूर आहेत. बंजारा समाज आजही ऊसतोड, वीटभट्टीवर मजुरी करताना दिसतो. अनेक तांड्यांना रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा नाहीत. त्यासाठी विकास आराखडा तयार करून तांडा सुधार योजनेअंतर्गत ४० लाखांच्या विकास निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. आभार श्याम राठोड यांनी मानले.