दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी अजय चव्हाण
माहूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेअंतर्गत लाभार्थींना पाच ते सहा महिन्यांपासून योजनेचा लाभ देण्यात आला नसल्यामुळे सर्व निराधार व्यक्तींना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अनेक लाभार्थी बँकेच्या चकरा मारत असून आपल्या खात्यात पैसे जमा झाले का, याची चौकशी करण्यातच त्यांचा वेळ जात आहे, “माझे पैसे जमा झाले का दादा” अशी केविलवाणी मागणी करताना सर्व सामान्य जनते चे हृदय हेलावून जाते, ही अपंग,निराधार लोकांची अवहेलना होत आहे.
अपंग, निराधारांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने तातडीने निधी देण्याची गरज आहे.
सुमारे सहा महिन्यांपासून योजनेचा लाभ देण्यात आला नसल्यामुळे सदरील लाभार्थीं ची दिवाळी अंधारात होणार असल्याची खंत व्यक्त होत आहे.