दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
व्यक्त होण हे नैसर्गिक आहे. म्हणून काहीही व्यक्त होण असा त्याचा अर्थ होत नाही . किमान तुलनात्मक दृष्ट्या तुल्यबळता असली पाहिजे . व्यक्त होण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत . काही लोक हे शब्द तुन व्यक्त होतात तर काही कृतीतून आणि काही मौन अवस्थेतून व्यक्त होतात . आपण जेव्हा व्यक्त होतो . तेव्हा त्याचे दोन मुख्य भाव असतात .एक म्हणजे नैसर्गिक भाव म्हणजे सहज भाव आणि दुसरा म्हणजे उद्देश हेतु भाव आणि त्यानुसार आपण व्यक्त केलेलं मत हे कोणत्या पद्धतीचे आहे. त्यानुसार त्याच मुल्यमापन सार्वजनिकरित्या होत असत. आणि सहज नैसर्गिक भाव ठेवून मत व्यक्त करताना आपण सजग असतो . परंतु उद्देश ठेवून आपण जेव्हा मत व्यक्त करतो . तेव्हा त्या विचारानुसार मतानुसार आपल पण कळतं न कळत मुल्यमापन होत असतं म्हणून मत नोंदवतान आपण जी काळजी घेऊ त्यानुसार आपली उंची निश्चित होत असते .आपण कोण , काय , आणि कुठल्या विषयावर कोणाच्या संदर्भात आपलं मत व्यक्त करतोय हे व्यक्तिगत आप आपल्या उंची वर अवलंबून असतं. आपली उंची हि आपल्या स्वतः ला माहित असते .आणि आपण जर उंची सोडून मत व्यक्त केले तर ते पण आपल्या लक्षात येतंच परंतु ते मान्य करण्यासाठी खुप मोठी ताकद शक्ती आपल्या मध्ये असली पाहिजे . आणि आपण जे मत व्यक्त केले ते जर पातळीच्या बाहेर असेल तर त्याला आपण स्वतः सोडलो तर फार इतर कोणी गांभीर्याने घेत नाही .कारण लोकांच्या मते सुर्याचे मोजमाप काढताना आपली उंची हि सुर्य मालेतील किमान गृह तारा असली पाहिजे तर त्या मोजमापाल अर्थ असतो . अन्यथा कारमुणिकी पलिकडले काहीच फलनिष्पत्ती नसते.आपण लोकशाही देशात वास्तव्यास आहेत. या बदल काहीच दुमत नाही प्रत्येक व्यक्तीला आपलं मत आपले विचार निर्धास्त पणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नव्हे तो भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना प्रदान केला आहे . म्हणून याचा अर्थ असा होत नाही कि आपल्यला जसं सुचेल जस वाटेल तसं बोलव .मत व्यक्त करणं मत प्रकट करण आणि आपले विचार मांडण याला एक नैसर्गिक मर्यादा असते . आणि हि मर्यादा म्हणजे संस्कारा .हि मर्यादा ज्याला समजली त्याला खुप काही समजलं . आपण एखाद्या राज्याच्या राजाविषयी मत व्यक्त करत असताना आपण किमान त्या राजाच्या मंत्री मंडाळतील सहकारी किंवा त्या राजाच्या तोला मोलाच्या उंचीच प्रख्यात व्यक्तिमत्व असलो पाहिजेत. तेव्हा त्या मताला भुमिकेल एक वलय निर्माण होईल आपण ज्यांच्या विषयी आपलं मत विचार व्यक्त करणार आहेत त्यांच्या आणि आपल्या मध्ये सामाजिक, राजकिय, वैचारिक, आर्थिक,ज्ञानिक, आणि वयोमानानुसार किती अंतर आहे याचा विचार करूनच मत व्यक्त झाला तर ते सुयोग्य न्याय संगत मत असतं. हल्ली एक लोक प्रथा झाली आहे कोणीही काही हि बोलत आहे .लोकांची तयामधुन फक्त करमणुक होते यापेक्षा वेगळं काही होत नाही .अशा बाबी गोष्टी सुजाण लोकांना फार रुचत नाहीत. पण लोकांना माहित असतं वास्तव काय आहे .म्हणून लोक अशा विषयांना फार गंभीरपणे घेत नाहीत. एकंदरीत काय तर मत विचार व्यक्त नक्कीच केले पाहिजे. परंतु ज्या पातळीवर ज्या टप्प्यावर आपल्यला आपलं मत विचार व्यक्त करायाचे आहेत त्या दिशेने आपलं स्थान आपली उंची याचा लोकांनी नाही तर आपण स्वतः व्यक्तिगत अधयान करून आपली भुमिका व्यक्त केली तर नक्कीच त्या मताला त्या विचाराला एक दर्जा एक अर्थ प्राप्त होईल. अन्यथा कारमुणिकी पलिकडले काहीच फलनिष्पत्ती होणार नाही.महणुन अंततः फल निष्पत्ती महत्वाची असते . आणि एक योग्य आणि सुसंकृत नागरिक म्हणून लोक परंपराच निर्वाहन करणं आपली जबाबदारी असते . म्हणून आपली उंची पाहुन मत व्यक्त करण कधीही उत्तम असतं .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301