दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रसिद्धी ने मोठा झालेला व्यक्ती हा विचाराने मोठा असेलच असं नाही . याला अपवाद असु शकतो . म्हणुनच जर प्रसिद्धी आणि विचाराने मोठा् हा योगायोग जुळून आला तर मग मात्र . हा योग ज्यांच्या बाबतीत येतो ते एकतर युगपुरुष ठरतात किंवा महापुरुष . प्रसिद्धी हि हल्ली फॅशन झाली आहे . अगदी बालवयापासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सगळेच प्रसिद्धी च्या पासून स्वतः दुर ठेवण्यात यशस्वी होताना दिसत नाहीत . म्हणून प्रसिद्धी मिळविण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा धोका पत्करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी संघर्ष करताना प्रत्येक जण दिसतोय याला खूप कमी लोक अपवाद आहेत . यातुन प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्पर्धा हि सुरू झाली . यासाठी अनेक वेगवेगळे संटट , सुरू झाले एक वेगळ्या प्रकारची मानसिकता वाढीस लागली .आणि या मानसिकतेतून अनेक वेगवेगळ्या घटना दुर्घटना जन्म घेऊ लागल्या आहेत. जिथं जीवीत धोक्यात घालण्याचा धाडस निर्माण होत यापेक्षा मोठं दुर्दैव काय असावं . ज्या सगळ्या मध्ये आपण एवढे मग्न झालो आहे मग ती प्रसिद्धी म्हणजे तरी नेमकं काय आहे. तर ख्याति,किर्ती,यश,महीमा , प्रतिष्ठा, नावलौकिक याला एक जनमानसात झळाळी मिळण .याला सर्वसाधारण पणे प्रसिद्धी म्हणता येईल . प्रसिद्धी मिळण हे वेगळं आणि मिळवणं हे वेगळं या मध्ये सुद्धा खूप मोठं अंतर आहे.तसेच नैसर्गिकरीत्या प्रसिद्धी मिळण हा आपल्या कार्याचा प्रयत्नांचा योग्यवेळी झालेला सन्मान असतो. आणि ,अति प्रयत्न करून प्रसिद्धी मिळवण म्हणजे , प्रसिद्धी मिळविण्यासाठी वाटेल तस आचरण करून प्रसिद्धी हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करणं वेगळं सध्या च्या विद्यमान युगात प्रसिद्धी ची स्पर्धा लागली आहे . प्रसिद्धी मिळाली पाहिजे या साठी निति,नियम , तत्व , नैतिकता सगळं वार्यावर सोडुन स्वाभिमान ,अभिमान गहण ठेवून प्रसिद्धी मिळवितानाचे प्रकार आपण पाहतोय , हल्ली तर अनेकांच्या साठी तर प्रसिद्धी हा जणुकाही आजार आहे. याच मुख्य कारण हे हि आहे कि लोकांनी आपल्यला मोठं म्हटलं पाहिजे . आणि मग त्या एका शब्दासाठी वाक्य साठी रात्र दिवस सुसाट वेगाने सुटणं हे आपण आजकाल समाजात सर्रासपणे पाहतोय . परंतु अशी अवस्था का निर्माण झाली आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी मेहनत करण प्रयत्न करून सातत्य टिकवून ठेवणं या मध्ये गैर नाही.अनेक प्रयत्न करून सुद्धा नैसर्गिक प्रसिद्धी हि वेळकाळ परस्थिती नुसारच मिळत असती . आणि जसं समुद्रातील लाट एकदा उसळली कि सर्वोच्च शिखर गाठते व शेवटी संपुष्टात येते .तसंच काहीसं प्रसिद्धीच असतं म्हणून केवळ आणि केवळ प्रसिद्धी ने मोठा झालेल्या व्यक्ती चा मोठेपणा हा तहयात टिकेल कि नाही याबाबत शंका असते .याला कारण हि तसंच आहे जर प्रसिद्धी सोबत विचाराने संस्काराने व्यक्ति मोठा झाला तर ती प्रसिद्धी तहयात टिकुन राहते.कोणत्याही क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण फार तसं पाहिलं तर अवघड नाही.पण प्रसिद्धी हि काही लोकांना मात्र नैसर्गिकरीत्या मिळते .तर काहींना अनंत अशा नानाविध प्रयत्ना नंतर मिळते . आणि म्हणूनच प्रसिद्धी मिळाली म्हणून माणुस मोठा होतो हे अर्धसत्य आहे. या मध्ये काही दुमत नाही पण प्रसिद्धी ने जो मोठा झाला. तो विचाराने संस्काराने मोठा असेलच असं नाही. काही व्यक्तिच्या संदर्भात हा अपवाद असु शकतो परंतु बहुतांश व्यक्तिमत्वा मध्ये तर हेच दिसत कि प्रसिद्धी ने जो मोठा होतो तो विचाराने संस्काराने मोठा असेलच असं नाही . म्हणून प्रसिद्धि ने भले तुम्ही अगदी छोटे असा लहान असा परंतु विचाराने मोठे असले पाहिजे . तेव्हा आपलं उपयोग आपलं जीवन सार्थकी लावण्यासाठी आणि समाजासाठी आपला उपयोग होतो .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301